Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिवाळीआधी वीज ग्राहकांना दिलासा मिळेल; ऊर्जामंत्र्यांचे संकेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

दिवाळीआधी वीज ग्राहकांना दिलासा मिळेल; ऊर्जामंत्र्यांचे संकेत

Surajya Digital
Last updated: 2020/11/02 at 5:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्यातील ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलाचे चटके अजुनही ग्राहकांना बसत आहेत. लॉकडाउनच्या काळात लोकांना वीजेची अव्वाच्या सव्वा बीलं आली होती. त्यावरून असंख्य तक्रारी केल्या गेल्या. राजकीय पक्षांनीही आवाज उठवला होता. त्यावरून राज्यात वादळही निर्माण झालं होतं. आता या प्रश्नावर लवकरच दिलासा मिळेल, असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.

याबाबतीत दिवाळी आधी निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, वाढीव वीज बिल संदर्भात मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, वित्त विभागात फाईल गेली आहे, अर्थमंत्री अजित पवार कोरोना झाला. त्यामुळे ते आले की निर्णय होईल. पण दिवाळी आधी लोकांना दिलासा मिळेल, असे संकेतही राऊत यांनी दिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* मुंबईतील बत्तीगुलची माहिती घेतली जातीय

ऊर्जामंत्री म्हणाले, 12 ऑक्टोबरला मुंबई अंधारात गेली, त्याची नेमकी कारणे काय याविषयी माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. या आधी कळवा, आणि आता टाटा पॉवर प्लान्ट आणि मंगळवारी अदानी वीज कंपनी येथे जाणार आहे. भविष्यात मुंबईत वीज जाता कामा नये यासाठी आढावा घेतला जात आहे.

टाटा वीज दोन संच बंद आहे ते लवकर कसे सुरू करून योग्य दरात वीज कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वीज वितरण व्यवस्था 10 हजार मेगावॅट मुंबईसाठी तयारी असते तरी ही वीज कशी गेली याची माहिती घेतली जात आहे.

* मुंबई आता वीज जाणार नाही

वीज नेमकी काय गेली यासंदर्भात तीन रिपोर्ट या महिन्यात येतील, त्यानंतर एमईआरसी समोर ते रिपोर्ट मांडले जातील. सायबर हल्ला होता का या संदर्भात शंका उपस्थितीत केली होती पण तांत्रिक रिपोर्टमध्ये याबाबत नेमके काय भाष्य होते हे पाहावे लागेल, असंही राऊत यांनी सांगितलं.

मुंबई आता वीज जाणार नाही याची खात्री आता देतो पण पुढील काळात मुंबई यासाठी वीज उत्पादन वाढवावे लागेल  खास करून जास्त उपयोग होणार असलेल्या काळात वीज वाढवली जावी, ही भूमिका आहे. मुंबईसाठी 3500 मेगावॅट अजून वीज लागेल, ती वीज कशी निर्मिती करता येते यासाठी कंपन्या समवेत चर्चा सुरू असल्याची माहितीही नितीन राऊत यांनी दिली.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #ऊर्जामंत्र्यांचे #संकेत #दिवाळीआधी #वीजग्राहकांना #दिलासा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रामविलास पासवान यांची हत्या? मुलगा चिराग पासवानवर संशय घेत चौकशीची मागणी
Next Article … तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल; शिवेंद्रराजेंचा इशारा, शरद पवारांनीही लक्ष घालावे

Latest News

‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी
Top News July 1, 2025
रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी
देश - विदेश July 1, 2025
राजदंड उचलण्याचा प्रयत्न, नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित
Top News July 1, 2025
ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन
देश - विदेश July 1, 2025
पहलगाम हल्ला हा एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते-  जयशंकर
Top News July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?