Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 75 ‘वंदे भारत’ रेल्वेची घोषणा; 2024 पर्यंत रेशन दुकानांवर पौष्टिक तांदूळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 75 ‘वंदे भारत’ रेल्वेची घोषणा; 2024 पर्यंत रेशन दुकानांवर पौष्टिक तांदूळ

Surajya Digital
Last updated: 2021/08/15 at 5:31 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारताचा आज 75 वा स्वातंत्र्य दिन. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर मोदी देशवासियांना संबोधित केले. भाषणाच्या सुरूवातीला मोदींनी महात्मा गांधींपासून नेहरूंपर्यंत सर्व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम केली. म्हणूनच हा फाळणीचा दिवस यापुढे दरवर्षी साजरा केला जाईल, असं नरेंद्र मोदी आवर्जून सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ कोविड नियमांच्या पालनासह झाला. त्यामुळे कार्यक्रम मोजक्याची उपस्थिती होती. तब्बल 1 तास 38 मिनिटे नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला संबोधित केलं. तर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा, असं आवाहन करताना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, तरच आपण कोरोनाला घालवू शकतो, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित केले. भारतीय रेल्वे नव्या रुपात समोर येत आहे. गतीने आधुनिक रुप घेत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 आठवड्यात 75 ‘वंदे भारत’ रेल्वे देशाच्या प्रत्येक भागाला जोडतील, असं मोदी म्हणाले. तसेच देशात हवाई सेवा वाढत आहेत. अनेक भागात विमानसेवा पोहोचत आहे. कनेक्टिविटी वाढत आहे, असंही ते म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भारताची विकास यात्रा सुरू करण्याची वेळ आली आहे. या विकास यात्रेची आता सुरुवात करून, पुढील 25 वर्षांचा प्रवास हा नवीन भारताच्या निर्मितीचा अमृत काळ आहे. या अमृत काळात आमच्या संकल्पांची पूर्तता आपल्याला स्वातंत्र्याच्या शंभर वर्षांपर्यंत घेऊन जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सर्व सैनिका शाळांची दरवाजे आता मुलींसाठीही उघण्यात येतील. देशात सध्या 33 सैनिकी शाळा आहेत. अडीच वर्षांपूर्वी मिझोराममध्ये मुलींना सैनिका शाळेत प्रवेश देण्याचा प्रयोग केला गेला. आता देशातील सर्व सैनिकी शाळांची दरवाजे मुलांसाठी खुली केली जातील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधांवर भर दिला. पंतप्रधान गतीशक्ती योजना सुरू करण्यात येईल. 100 लाख कोटी रुपयांहून अधिकच्या योजनांमुळे तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील. पंतप्रधान गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन हा औद्योगिक उलाढालीला चालना देणं आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणारा असणार असल्याचे सांगितले.

सरकार कुपोषणाच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. याअंतर्गत मध्यान्ह भोजन यासारख्या विविध योजनांद्वारे गरिबांना वितरित करण्यात येणारा तांदूळ पौष्टिक केला जाईल. सरकार आपल्या विविध योजनांतर्गत जे तांदूळ गरीबांना देते, ते आता पौष्टिक तांदूळ देईल. रेशन दुकानातून दिला जाणारा तांदूळ असो की मध्यान्ह भोजणासाठी दिला जाणारा तांदूळ, 2024 पर्यंत प्रत्येक योजनेद्वारे दिला जाणारा तांदूळ हा पौष्टिक केला जाणार असल्याचे सांगितले.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #75व्या #स्वातंत्र्यदिनानिमित्त #75वंदेभारत #रेल्वेची #घोषणा #रेशनदुकानांवर #पौष्टिक #तांदूळ, #Announcement #VandeBharat #Railways #occasion #Nutritious #rice #ration
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकरी आंदोलन ! स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात शिपिंग कंटेनरची भिंत
Next Article श्री पांडुरंग कारखान्यावरील रक्तदान शिबिरात ४०० जणांचे रक्तदान

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?