लंडन, 28 जून (हिं.स.) :
पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू
करण्यासाठी भारतीय महिला संघासाठी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेला आजपासून
सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ आगामी पाच सामन्यांच्या
मालिकेद्वारे इंग्लंडच्या खेळण्याच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं आव्हान असेल.
येथे दोघेही तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकमेकांसमोर येतील.
स्फोटक सलामीवीर
शेफाली वर्माच्या पुनरागमनाव्यतिरिक्त,भारताने क्रांती गौड, श्री चरणी आणि
सायली सातघरे सारखे काही नवीन चेहऱ्यांचा समावेश आपल्या संघात केला आहे.उमा छेत्री
काही सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून प्रभाव पाडू शकली नसल्यामुळे शेफालीला स्मृती
मानधनासोबत डावाची सुरुवात करण्याची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
हा भारताचा वर्षातील पहिला टी-२० सामना आहे आणि
सर्वांच्या नजरा ऑफ-स्पिन ऑलराउंडर स्नेह राणा आणि वेगवान गोलंदाजी अष्टपैलू
अमनजोत कौर यांच्या पुनरागमनावर असतील. राणा फेब्रुवारी २०२३ नंतर संघात पुनरागमन
करत आहे. यावर्षीच्या महिला प्रीमियर लीगमध्ये चांगल्या कामगिरीनंतर तिचा
आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यानभारताला वेगवान
गोलंदाज रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांची उणीव भासणार आहे. ज्या दुखापतीमुळे
या मालिकेतून बाहेर आहेत.