Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टीम इंडियाचा सात गडी राखून इंग्लंडवर मात, किशन पदार्पणात झाला सामनावीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

टीम इंडियाचा सात गडी राखून इंग्लंडवर मात, किशन पदार्पणात झाला सामनावीर

Surajya Digital
Last updated: 2021/03/15 at 10:36 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : सलामीच्या लढतीत दारुण पराभव झालेल्या ‘टीम इंडिया’ने दुस-या टी-20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा 7 गडी आणि 13 चेंडू राखून धुव्वा उडवला. पदार्पणवीर इशान किशनचे वादळी अर्धशतक आणि कर्णधार विराट कोहलीची मॅचविनिंग खेळी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली.

किशनने पदार्पणाच्या लढतीत ‘सामनावीरा’चा बहुमान मिळविला हे विशेष. हिंदुस्थानने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. धडाकेबाज खेळी साकारताना कर्णधार विराटने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत 12 हजार धावा करणारा कर्णधार म्हणून आपले नाव नोंदवले आहे.

इंग्लंडकडून मिळालेले 165 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 17.5 षटकांत षटकांत 3 बाद 166 धावा करून पूर्ण केले. पहिल्या लढतीत एका धावेवर बाद झालेल्या लोकेश राहुलला दुस-या लढतीत भोपळाही फोडता आला नाही.

सॅक कुरणने त्याला यष्टीमागे बटलरकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला पहिल्याच षटकात हादरा दिला. दुसरा सलामीवीर इशान किशन व आलेला विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानच्या डावाला आकार दिला. पदार्पणाच्या टी-20 सामन्यात अर्धशतक ठोकणारा किशन हा दुसरा हिंदुस्थानी फलंदाज ठरला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कसोटी, एकदिवसीय व टी-20 या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत 12 हजार धावा करणारा विराट कोहली हा पहिला कर्णधार ठरला. कुठल्याही संघाच्या कर्णधाराला आतापर्यंत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा गाठता आलेला नाही.
कर्णधार या नात्याने सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही कोहली तिस-या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग 15,440 धावांसह अव्वल स्थानावर आहे.

* रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर

इंग्लंडविरुद्ध काल दुसरा टी-20 सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद अर्धशतकी 73 (49) खेळी केली. यासोबतच विराटने एका विक्रमात रोहित शर्माला मागे टाकले आहे. विराटने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक (26) अर्धशतकांचा विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक अर्धशतकं: (1) विराट कोहली- 26, (2) रोहित शर्मा- 25, (3) डेव्हिड वॉर्नर- 19.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #TeamIndia #England #sevenwickets #Kishan #debut, #टीमइंडियाचा #सातगडी #इंग्लंडवर #मात #किशन #पदार्पणात #सामनावीर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘ताज महालचं नामकरण लवकरच राम महाल होणार’
Next Article प्रचारादरम्यान अभिनेता, नेते कमल हसनवर हल्ला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?