नवी दिल्ली , 21 मार्च (हिं.स.)।भारताने कोळसा उत्पादनात दमदार कामगिरी करत, ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. भारताने कोळसा उत्पादनात १ अब्ज टनचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या बद्दलची माहिती केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज (दि.२१) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून दिली आहे.
केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे की, “भारताने कोळसा उत्पादनाचा एक अब्ज टनांचा टप्पा ओलांडला आहे ! अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यक्षम पद्धतींसह, आम्ही केवळ उत्पादन वाढवले नाही, तर शाश्वत आणि जबाबदार खाणकाम देखील सुनिश्चित केले आहे. ही कामगिरी आमच्या वाढत्या वीज मागणीला चालना देईल, आर्थिक विकासाला चालना देईल आणि प्रत्येक भारतीयाचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत जागतिक ऊर्जा नेता बनण्याच्या मार्गावर असल्याचे देखील रेड्डी यांनी म्हटले आहे.”
‘आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षेचा कणा म्हणून काम करणाऱ्या कोळसा क्षेत्रातील समर्पित कर्मचाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि वचनबद्धतेमुळे हे शक्य झाले आहे’, असे देखील केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी म्हटले आहे.”
या मोठ्या कामगिरीबद्दल, पंतप्रधान मोदींनी कोळसा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारतासाठी अभिमानाचा क्षण! १ अब्ज टन कोळसा उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. जी ऊर्जा सुरक्षा, आर्थिक वाढ आणि स्वावलंबनाप्रती आमची वचनबद्धता अधोरेखित करते. हे यश या क्षेत्राशी संबंधित सर्वांचे समर्पण आणि कठोर परिश्रम देखील प्रतिबिंबित करते.