Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताची पाकिस्तानी विमानांवर हवाई बंदी २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारताची पाकिस्तानी विमानांवर हवाई बंदी २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली

admin
Last updated: 2025/07/23 at 4:27 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 23 जुलै – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव अधिकच वाढला. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. ही बंदी आता २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मंगळवारी (दि. २२) मुरलीधर मोहोळ यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करत बंदीवाढीची घोषणा केली.

“पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यास प्रतिबंध करणारी ‘नोटिस टू एअरमेन’ (NOTAM) अधिकृतरित्या २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही निर्णय सुरक्षा धोरणांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.” असे त्यांनी सांगितले.

या निर्बंधांबाबत आणखी अपडेट्स लवकरच जाहीर करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, पाकिस्तानने देखील भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद ठेवण्याचा निर्णय एका महिन्यासाठी, म्हणजेच २४ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवला आहे, अशी माहिती पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने दिली.

ही बंदी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ५.१९ वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, २३ ते २५ जुलैदरम्यान राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर भारतीय हवाई दलाचे विशेष युद्धसराव (Air Force Exercise) आयोजित करण्यात आले असून, त्या पार्श्वभूमीवरही NOTAM जारी करण्यात आला आहे.

भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता दोन्ही देशांनी हवाई बंदीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अखेर ३८ दिवसांनंतर ब्रिटिश लढाऊ विमान एफ-35बीने केरळहून भरलं उड्डाण
Next Article भारताची चीनसाठी मोठी घोषणा : ५ वर्षांनंतर चिनी नागरिकांसाठी टुरिस्ट व्हिसा पुन्हा सुरु

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?