Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर भारताचा ऐतिहासिक विजय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर भारताचा ऐतिहासिक विजय

Surajya Digital
Last updated: 2021/08/17 at 9:34 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लंडन : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत लॉर्ड्सवर झालेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १५१ धावांनी मात केली.क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विराट कोहलीने लॉर्ड्सवरील विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला दिले.

लॉर्ड्स मैदानावर भारताचा हा तिसरा कसोटी विजय ठरला. पहिल्या सामन्यातही भारताला विजयाची संधी होती, मात्र अखेरच्या दिवशी ही संधी पावसाने हिरावून नेली होती. दुसर्‍या सामन्यात मात्र भारताने सांघिक खेळाच्या जोरावर बाजी मारली. इंग्लंडला २७२ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर भारतीयांनी सुरुवातीपासून टिच्चून मारा करत सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखले.

एकवेळ इंग्लंडच्या दिशेने झुकलेल्या आणि नंतर अनिर्णित होणार असे वाटणाऱ्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाने अखेरच्या दिवशी जोरदार खेळ करत विजय खेचून आणला. दरम्यान, लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने विजयाचे गुपित उलगडले आहे.

मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी दुसऱ्या डावात नवव्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीने भारतीय संघासाठी विजयाची वातावरणनिर्मिती केली, असे सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मोहम्मद शमी ७० चेंडूत नाबाद ५६ धावा आणि जसप्रीत बुमराह ६४ चेंडूत नाबाद ३४ धावा यांनी नवव्या विकेटसाठी केलेल्या अभेद्य ८९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने २७१ धावांची भागीदारी करून इंग्लंडसमोर २७२ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर इंग्लंडला १२० धावांत गुंडाळत भारताने हा सामना १५१ धावांनी जिंकला.

सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, लॉर्ड्सच्या खेळपट्टीवरून पहिले तीन दिवस गोलंदाजांना मदत मिळाली नाही. मात्र आम्ही आखलेली रणनीती योग्य पद्धतीने लागू केली. दुसऱ्या डावात शमी आणि बुमराह यांनी ज्याप्रकारे दाबावाच्या परिस्थिती फलंदाजी केली ती अतुलनीय होती. इथूनच वातावरणनिर्मिती झाली. त्यामुळे आम्हाला पुढे मदत मिळाली. तळाच्या फलंदाजांना अशी भागीदारी करण्याची संधी क्वचितच मिळते. मात्र जेव्हा जेव्हा आम्हाला यश मिळाले आहे तेव्हा तेव्हा आमच्या तळाच्या फलंदाजांनी योगदान दिले आहे.

६० षटकांमध्ये २७२ धावा जमवणे कठीण असेल. मात्र १० बळी टिपणे शक्य आहे, असा आमचा अंदाज होता. त्याचदरम्यान, मैदानावर असलेल्या थोड्या तणावाने आम्हाला प्रेरित केले. आम्ही शमी आणि बुमराहचा उत्साह वाढवू इच्छित होतो. त्यामुळेच आम्ही नवा चेंडू त्यांच्या हाती सोपवला आणि त्यांनीही लगेच बळी मिळवत आपचा विश्वास सार्थ ठरवला, असेही विराट कोहली म्हणाला.

You Might Also Like

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा विक्रमी १५० वा वनडे सामना

TAGGED: #India's #historic #victory #cricket's #Lord, #क्रिकेटची #पंढरी #लॉर्ड्सवर #भारताचा #ऐतिहासिक #विजय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रक्तपात टाळण्यासाठी देश सोडला, मात्र पैशाने भरलेल्या गाड्या, हेलिकॉप्टर घेऊन अशरफ घनी फरार
Next Article भयानक फोटो : 134 क्षमतेच्या विमानात घुसले 800 लोक; तालिबान्यांनी शहरात कर्फ्यू लावला

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?