लंडन, 23 जून (हिं.स.)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना
रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. भारतीय संघाने तिसऱ्या दिवसअखेर २ बाद ९० धावा केल्या
आहेत. भारतीय संघाकडे आता ९६ धावांची आघाडी आहे. कर्णधार शुभमन गिल ६ धावांवर तर
सलामीवीर के.एल. राहुल ४७ धावांवर खेळत आहे.
जसप्रीत बुमराह हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज
कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ठरला आहे. त्याने ८३ धावा देत इंग्लंडच्या ५ फलंदाजांना
बाद केले. आणि यामुळेच पहिल्या डावात टीम इंडिया इंग्लंडला ४६५ धावांवर रोखू शकली.
इंग्लंडला आघाडी घेण्यापासून रोखल्यानंतर भारताला ६ धावांची पहिल्या डावात माफक
आघाडी मिळाली.
लीड्स कसोटीमध्ये आता भारताच्या मधल्या फळीवर
भिस्त असणार आहे. कसोटीच्या चौथ्या दिवशी कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी के.एल.
राहुलवर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्याची भिस्त असणार आहे.