Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताने बॉर्डर – गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

भारताने बॉर्डर – गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली

Surajya Digital
Last updated: 2021/01/19 at 1:59 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची चौथी आणि अंतिम कसोटी भारताने जिंकत ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारताने बॉर्डर गावस्कर मालिका 2-1 अशी जिंकली आहे. ऋषभ पंतने केलेल्या नाबाद 89 धावांच्या जीवावर भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात 336 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 33 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 294 धावा करत भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रोहित शर्मा 7 धावांवर बाद झाला. पण भारताचा शुबमन गिल याने दमदार अर्धशतकी खेळी केली. आपला तिसराच कसोटी सामना खेळणारा शुबमन गिल याने 146 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 91 धावांची खेळी केली. पुजाराच्या साथीने त्याने डाव सावरला. नव्वदीत असताना त्याने नॅथन लायनच्या बाहेरच्या रेषेत असलेल्या चेंडूला बॅट लावली आणि तो झेलबाद झाला. कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही वेगाने धावा करण्यास सुरूवात केली होती. त्याने एक षटकार आणि एक चौकार खेचत फटकेबाजी केली. पण तो ही 22 धावांवर बाद झाला. अनुभवी चेतेश्वर पुजाराने भारतीय संघाची पारी सावरत 56 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या मयंक अगरवालने 9 धावा केल्या व तो बाद झाला.

मैदानात असलेल्या ऋषभ पंतने आक्रामक फलंदाजी करत ऑस्टेलियाच्या गोलंदाना सळो की पळो करून सोडले. त्याला वॉशिंगटन सुंदरने अप्रतिम साथ दिली. सुंदर 22 धावा करून लायनच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्याने 2 चौकार व 1 षटकार लगावला. ऋषभ पंतच्या साथीला आलेल्या शार्दुल ठाकुरही फार काळ टिकू शकला नाही तो 2 धावा करून झेल बाद झाला. त्यानंतर आलेल्या सैनी सोबत पंतने विजयश्री खेचून आणली. ऋषभ पंतने 9 चौकार व एक षटकाराच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 89 धावांची खेळी केली.

You Might Also Like

बीसीसीआय उपाध्यक्ष शुक्लांनी रोहित-कोहलीच्या निवृत्तीच्या अफवा फेटाळल्या

भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट मालिकेवर बंदी कायम; आशिया कपसाठी मार्ग मोकळा

अजिंक्य रहाणेने सोडले मुंबई क्रिकेट संघाचे कर्णधारपद

बेकायदेशीर बेटिंग ऍप प्रकरणात सुरेश रैनाला ईडीची नोटीस

पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय

TAGGED: #भारताने #बॉर्डरगावसकर #कसोटीमालिका #२-१नेजिंकली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा, केंद्राचा निर्णय
Next Article पत्नीने खांद्यावर पतीला घेऊन केला निवडणुकीतला विजयाचा आनंद

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?