Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन

admin
Last updated: 2025/05/07 at 4:21 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

जेरुसलेम, 7 मे (हिं.स.)।भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानातील तब्बल ९ दहशतवादी ठिकाणांवर थेट हवाई हल्ले करत भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते केली. भारताच्या या एअर स्ट्राइकनंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिकेनंतर आता इस्रायलकडून ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य करण्यात आले आहे. या एअर स्ट्राइकचे इस्रायलकडून समर्थन करण्यात आले आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी एक्सवर पोस्ट करत भारताला खुले समर्थन दिले आहे.

इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे इस्रायल समर्थन करतो. निरपराध लोकांवर केलेल्या भयंकर हल्ल्यानंतर लपण्यासाठी कुठेही स्थान मिळणार नाही, याचा धडा दहशतवाद्यांना मिळालाच पाहिजे, असे अझर यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि दक्षिण आशियातील तज्ज्ञ मायकेल कुगेलमन यांनी यावर प्रतिक्रिया दिली. भारताने पाकिस्तानवर अधिक जोरदार हल्ला चढवला. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील परिस्थिती २०१९ पेक्षाही खराब होऊ शकते, असेही ते म्हणाले.

दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. त्या ठिकाणांहून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले गेले आणि निर्देशित केले गेले. भारतीय सशस्त्र दलांनी एकूण ९ ठिकाणी लक्ष्य करण्यात आले. आमच्या कारवाईत कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नाही. भारताने ज्या ठिकाणी कारवाई केली, त्याच्या पद्धतीत भारताने बराच संयम दाखवला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात सामील असलेल्यांना जबाबदार धरले जाईल, या वचनबद्धतेचे आम्ही पालन करत आहोत, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

You Might Also Like

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू

ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन

भारताने नष्ट केलेल्या दहशदवादी तळांचे पुनर्वसन करू- पाकिस्तान

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ

यूपीएससीच्या अध्यक्षपदी अजय कुमार यांची नियुक्ती

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑपरेशन सिंदूर : राहुल गांधी, ओवैसींकडून कारवाईचे कौतुक
Next Article यशवंत पंचायत राजमध्ये सोलापूर जिल्हा परिषद तृतीय

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?