मुंबई : सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर परब यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे’, असं ते म्हणाले.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1379796729520787457?s=19
निलंबित पोलीस साहायक सचिन वाझे यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. परब यांनी सचिन वाझेंकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं. मात्र, या विषयावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र दिलंय. त्या पत्रात त्यांनी माझा उल्लेख केला आहे. मी सचिन वाझे यांना बोलावलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. २०२० च्या जून, ऑगस्टमध्ये सचिन वाझे यांना एसबीयूटी प्रकरणामध्ये ट्रस्टींकडून 50 कोटी जमा करण्याचे आदेश मी त्यांना दिले, असा गंभीर आरोप वाझे यांनी पत्रात केला आहे. जानेवारी 2021 मध्ये मी मुंबई महापालिकेचा क्रॉन्ट्रक्टरकडून प्रत्येकी दोन कोटी जमा करण्याच्या सूचना दिल्या, असा दुसरा आरोप त्यांनी केलाय. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवपसैनिक आहे. माझ्यावर अशाप्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाही. म्हणून मी माझ्या दोन मुली आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे सर्व खोटं आहे. हे मला नाहक बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात आले आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1379834985574662144?s=19
भाजपचे पदाधिकारी आरडाओरड करत होते. या प्रकरणात आम्ही तिसरा बळी घेऊ, असं ते म्हणत होते. याचा अर्थ त्यांनी दोन-तीन दिवसांपासून हे प्रकरण शिजवलं आहे. त्यांनी सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण तयार केलं आहे. सचिन वाझे पत्र देणार हे कदाचित त्यांना माहिती होतं. त्यामुळे केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरुन त्यांनी आरोप केले आहेत. या पत्रात वाझेंनी माझ्यावर, अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचा माणूस म्हणून एकावर आरोप केले आहेत. पण त्याने केलेले दोन आरोपांशी माझा काहीच संबंध नाही. महापालिकेच्या कुठल्याही कंत्राटदाराशी माझी ओळख नाही. त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1379838767050067970?s=19
मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मानसाला बदनाम करणं गरजेचं आहे, ही स्ट्रॅटेजी आहे. तसं करुन सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. हे प्रकरण जाणीवपूर्वक वेगवेगळ्या दिशेला वळवले जात आहे. मी नार्कोटिक्ससाठी देखील तयार आहे. ज्या शिवसैनिकांना माझ्यावर विश्वास आहे त्यांना मी असं कधीही करणार नाही हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडत आहे.
