Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जनतेचाही सहभाग होता, तर मग जनतेची ही चौकशी करणार का?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

जनतेचाही सहभाग होता, तर मग जनतेची ही चौकशी करणार का?

Surajya Digital
Last updated: 2020/10/15 at 2:35 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोल्हापूर : राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान चौकशी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय चुकीचा असून सहभाग घेणाऱ्या जनतेचीही चौकशी करणार का ? असा सवाल त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना विचारला आहे.

ठाकरे सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय चुकीचा आहे. यामध्ये जनतेचाही सहभाग होता, तर मग जनतेची ही चौकशी करणार का? जलयुक्त शिवार योजनेबाबत सरकार कोणाचीही चौकशी करू शकतं. मात्र त्यातून चांगली कामं झाली आहेत याचा विसर पडता कामा नये,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

जलयुक्त शिवार योजनेचे अनेक फायदे झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं. “जमिनीतील पाणी साठा वाढला असून त्याचा फायदा झाल्याचं शेतकऱ्यांनी अनुभवलं आहे. पीक दुबार तिबार घेण्याचा आनंद शेतकऱ्यांनी अनुभवला आहे. पाणीटंचाईचे बरेच प्रश्न कमी झाले असून पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या कमी झाली आहे,” असं त्यांनी सांगितलं.

* आरेमधील कारशेड निर्णयावर टीका

आरेमधील कारशेड कांजूरला हलवण्याच्या निर्णयावरही टीका केली. “आरे येथील कारशेड बदलण्याचा निर्णय चुकीचा आहे. कांजूरमार्ग येथे तो बदलण्याचा निर्णय सरकारच्या अंगलट येईल. त्यामुळे हा प्रकल्प पाच वर्षे रखडेल,” अशी भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली. “राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी

अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात

लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ

TAGGED: #चंद्रकांतपाटील #जलयुक्तशिवार #चौकशी #जनतेचासहभाग #त्यांची #चौकशी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंचनामा करायला पिक तर कुठंय, शेतीचं वाहून गेली
Next Article सोलापूर-मंगळवेढा महामार्गावरील वाहतूक ठप्प; बेगमपूर पूल गेला पाण्याखाली

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?