श्रीनगर, 13 मे (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील शुक्रू केलर भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गोपनीय माहितीच्या आधारे केलर परिसरात शोध मोहीम राबवताना ही चकमक झाल्याची माहिती भारतीय सैन्याने ट्विट (एक्स) करत दिली.
सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत, तर कारवाई सुरूच आहे., राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या विशेष गुप्तचर युनिटला शोपियानच्या शोकल केलरमध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली.यानंतर भारतीय सैन्याने शोध मोहीम सुरू केली.
या कारवाईदरम्यान, दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला, ज्यामुळे चकमक सुरू झाली. परिणामी, 3 दहशतवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला करून 26 हिंदू पर्यटकांची हत्या केली होती. तेव्हापासून जम्मू-काश्मीरमध्ये विशेष शोध मोहीम राबवली जात आहे. या कारवाईअंतर्गत मंगळवारी दहशतवाद्यांशी चकमक झाली. मारले गेलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी होते की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. लष्कर याबाबत माहिती गोळा करत आहे.