Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जम्मू-काश्मीर : घुसखोरी प्रकरणी एनआयएची छापेमारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

जम्मू-काश्मीर : घुसखोरी प्रकरणी एनआयएची छापेमारी

admin
Last updated: 2025/03/19 at 1:06 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

राज्यातील 10 ठिकाणी एकाच वेळी केली कारवाई

जम्मू,19 मार्च (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या भटिंडी येथील घुसखोरी प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज,बुधवारी सकाळी जम्मूमध्ये 10 ठिकाणी छापे टाकले. पाकिस्तानातून भारतात होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीसंदर्भात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरी प्रकरणी एनआयए छापे टाकत आहे. यापूर्वी 13 डिसेंबर 2024 रोजी एनआयएने राज्यात 19 ठिकाणी छापेमारी केली होती. या काळात जम्मू आणि काश्मीरमधील रियासी, बडगाम, अनंतनाग आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. तसेच 21 नोव्हेंबर 2024 रोजी एनआयएने जम्मूच्या अनेक भागात छापे टाकले होते. एनआयएच्या या छाप्याचा उद्देश पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नांबद्दल महत्त्वाची माहिती गोळा करणे हा होता. एनआयएने पोलिस आणि निमलष्करी दल सीआरपीएफच्या मदतीने अनेक ठिकाणी छापे टाकले होते.

गेल्या 5 ऑक्टोबर रोजी दहशतवादी कट रचणे आणि दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या संशयावरून 5 राज्यांमधील 22 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले होते. एनआयएने महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्ली येथे ही छापेमारी केली होती. ही कारवाई जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित बाबींसंदर्भात करण्यात आली. एनआयएने बारामुल्ला आणि जम्मू-काश्मीरमधील इतर भागातही छापे टाकले. एनआयएने सुरक्षा दलांच्या मदतीने बारामुल्ला येथील मौलवी इक्बाल भट यांच्या घराची झडती घेतली.

एनआयएच्या या कारवाईपूर्वी 1 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी एनआयएच्या पथकाने दक्षिण चोवीस परगणा, आसनसोल, हावडा, नादिया आणि कोलकाता येथील 11 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या.

You Might Also Like

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी

फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना

शशी थरूर यांनी श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींच्या अटकेवर चिंता व्यक्त केली

 युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की पुतिनसोबत चर्चासाठी तयार; शांतता प्रयत्नांवर भर

“राष्ट्रीय हितांवर कोणतीही तडजोड नाही” – जयशंकर यांचा अमेरिकेशी चर्चेसंदर्भात स्पष्टीकरण

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बापरे! कलेक्टर कचेरीतच आत्महत्याचा प्रयत्न, ‘काय’ कारण ?
Next Article हिंजवडीत टेम्पो ट्रव्हरला आग : चौघांचा मृत्यू, ६ जखमी

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?