Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जरांगेंचे आंदोलन आरक्षणासाठी नव्हे, सरकार उलथवण्यासाठी रचलेला कट”- लक्ष्मण हाके
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

जरांगेंचे आंदोलन आरक्षणासाठी नव्हे, सरकार उलथवण्यासाठी रचलेला कट”- लक्ष्मण हाके

admin
Last updated: 2025/08/29 at 5:20 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

बीड, २९ ऑगस्ट. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हे मराठा आरक्षणासाठी नसून सरकार उलथवण्यासाठी रचलेला कट असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्या तर ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. ओबीसी समाजाला मूळतः राज्यकर्त्या जमातींपासून संरक्षण मिळावे म्हणून आरक्षण देण्यात आले होते. मात्र, आज ज्या समाजापासून ओबीसींना संरक्षणाची गरज आहे, तेच लोक ओबीसींच्या कळपात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका हाकेंनी केली.

ते म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्ट केले त्याचे मी स्वागत करतो. पण जर राज्यात ५९ लाख कुणबी प्रमाणपत्रे वाटली गेली असतील, तर ओबीसींच्या हक्कांवर गदा येणे निश्चित आहे. राज्यातील सुतार, कुंभार, परत, नाभिक, मेंढपाळ, बंजारा समाज यांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. ओबीसी समाज रस्त्यावर उतरत नाही, बोलत नाही म्हणून त्यांचे आरक्षण संपवायचे का? जर सरकारला झुंडशाही समजत असेल, तर आम्हालाही संघर्ष यात्रा आणि मोर्चे काढावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे राजकीय डाव असल्याचा दावा करत हाके म्हणाले की, जरांगे यांनीच उघड केले होते की, ते हे सरकार उलथवून टाकणार आहेत. प्रत्यक्षात विरोधी पक्ष सरकार बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेच, पण त्यात अजित पवार गटातील आमदार-खासदारही सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. जरांगे यांच्या आडून राज्यातील सत्ताधारीच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. गरीब मराठा बांधवांच्या शिक्षण-नोकरीसाठी हा लढा नसून सरकार उलथवण्यासाठी रचलेला कट आहे, असा गंभीर आरोप हाकेंनी केला.

You Might Also Like

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी

अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात

लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन
Next Article खा.शरद पवार यांनी घेतली नांदेड पूर परिस्थितीची माहिती

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?