Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकरी आक्रमक : आचेगावचा जयहिंद कारखाना तीन तास बंद पाडला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शेतकरी आक्रमक : आचेगावचा जयहिंद कारखाना तीन तास बंद पाडला

Surajya Digital
Last updated: 2022/04/11 at 8:10 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अक्कलकोट : ऊस बिल थकीत रक्कम न दिल्याने आचेगाव जयहिंद शुगरच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज एल्गार पुकारला. वजन काटा, क्रेन बंद पाडत  कारखाना ३ तास बंद पाडला. गेल्या दोन वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिल थकीत ठेवल्याने शेतकरी आक्रमक झाले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जय हिंद शुगर प्रा लिमटेड या साखर कारखान्याने सन २०१९ -२० या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत रक्कम न दिल्याने अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जय हिंद शुगरचे वजन काटा बंद करत क्रेन बंद करून तीव्र आंदोलन केले.

गेल्या दोन वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला लाखो टन ऊस जय हिंद कारखान्याला गळपासाठी पाठवला होता. २०१९ साली साखर कारखान्याची स्पर्धा होती. त्यामुळे अनेक कारखान्याने एफआरपी पेक्षा वाजवी दर देण्याचे आश्वासन दिले. याप्रमाणे जय हिंद शुगरने सुद्धा एफआरपीपेक्षा २५११ रुपये प्रति टन दर देण्याचे आश्वासन देत तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊस आपल्या कारखान्याकडे नेले.

यापैकी काही शेतकऱ्यांना अश्वासनाप्रमाणे २५११ रुपये दर भेटला व जवळपास ६०० शेतकऱ्यांना २२३८ दर भेटला आणि उर्वरित २७३ रुपये रक्कम शेतकऱ्यांना देणे असताना जय हिंद कारखाना जाणूनबुजून थकवले.

Farmers attack: Jayhind factory in Achegaon closed for three hours

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

यासाठी शेतकऱ्यांनी कारखाना व पोलीस प्रशासनास लेखी निवेदन देत कळवले आणि या व्यतिरिक्त जय हिंदच्या विरोधात आजवर पाच वेळा उपोषणे आणि आंदोलने ही केली पण याचा काहीही परिमाण जय हिंद शुगरला झाला नाही.

दोन वर्षांपासून या पीडित शेतकऱ्यांना खोटे सांगून वेळोवेळी आश्वासन दिले.  गेले दोन वर्षे कोरोनाचा काळ असल्याने शासनाच्या नियमानुसार जमाव बंदीचा आदेश होता. त्यामुळे हे पीडित शेतकरी एकत्रित येऊन आंदोलन करू शकले नाहीत. पण या काळात शेतकरी स्वतः कारखाना प्रशासनाला थकीत रक्कमेची मागणी करत होते. पण कारखाना वेगवेगळे करणे सांगून वेळ मारून नेत असत. थकीत रक्कमे बद्दल विचारले असता आज करू उद्या करू असे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची तोंडे पुसले.

वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेले ऊस कारखान्याला पाठवून दोन वर्षे होत आली पण ६०० शेतकऱ्यांना उर्वरित थकीत रक्कम मिळत नाही. शेतकऱ्यांना कोण वाली आहे का नाही ? म्हणत आज सोमवारी  सकाळी १० च्या दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जय हिंद शुगर आचेगाव येथे एकत्रित येऊन कारखान्याच्या विरोधात एल्गार पुकारला.

इतक्या मोठ्या आंदोलनास्थळी कारखान्याचा एक ही प्रतिनिधी भेट दिला नाही आणि फिरकले सुद्धा नाही. शेवटी पोलीस प्रशासनाने जय हिंदच्या प्रामुखाला दूरध्वनीवरून संपर्क करून कळवले त्यानंतर येत्या रविवारी याबाबत निर्णय घेण्यात येईल असे कळाले. येणाऱ्या काळात जय हिंद शुगर कारखान्याच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल, असे ही शेतकरी वर्गातून सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Farmers #attack #Jayhind #factory #Achegaon #closed #threehours, #शेतकरी #आक्रमक #आचेगाव #जयहिंद #कारखाना #तीनतास #बंद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वकील सदावर्ते यांच्या कोठडीतील मुक्काम वाढला, पुरीलाही घेतले ताब्यात
Next Article कोरोना काळात पास झालेल्यांची नोकरीसाठी विशेष परीक्षा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?