Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘काँग्रेसमध्ये असतानाच एवढी चिंता राहुल गांधीना असती, तर…; सिंधियांनी राहुल गांधींना लगावला टोला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेशराजकारण

‘काँग्रेसमध्ये असतानाच एवढी चिंता राहुल गांधीना असती, तर…; सिंधियांनी राहुल गांधींना लगावला टोला

Surajya Digital
Last updated: 2021/03/09 at 11:30 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : ‘ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसमध्ये राहून मुख्यमंत्री होऊ शकतात’, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधींनी केले. यावरून सिंधिया यांनी राहुल गांधींना टोला लगावला. ‘मी काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींना माझी एवढी चिंता असती तर चांगलं झालं असतं, असं खोचक उत्तर सिंधिया यांनी दिलं. दरम्यान, मागील वर्षी मार्च महिन्यात सिंधिया यांनी आपल्या 22 समर्थकांसहीत काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे पुन्हा त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले मध्य प्रदेशमधील नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी राहुल यांनी ज्योतिरादित्य सिंधिया आज काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, असं वक्तव्य केलं. यावर आता ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राहुल यांना टोला लगावत उत्तर दिलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ज्योतिरादित्य यांनी, राहुल गांधी यांनी आधी याबद्दल चिंता केली असती तर बरं झालं असतं, असं म्हटलं आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन मध्य प्रदेशमधील राजकारण सध्या चांगलच तापलं आहे. प्रत्येक पक्षाकडून यासंदर्भात भाष्य केलं जात असतानाच आता खुद्द ज्योतिरादित्य सिंधियांनीही याबद्दल मत व्यक्त केलं आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया आज काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते असं वक्तव्य करणाऱ्या राहुल यांना शिंदेंनी टोला लगावला आहे. “मी काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींना माझी एवढी चिंता असती तर चांगलं झालं असतं,” असं खोचक उत्तर ज्योतिरादित्य यांनी या वक्तव्यासंदर्भात बोलताना दिलं आहे.

* जोत्यिरादित्य मुख्यमंत्री होणार नाहीत, त्यांना काँग्रेसमध्ये परतावे लागेल

राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य सिंधियाबद्दल बोलताना, ते भाजपामध्ये जाऊन मागील बाकावरील विद्यार्थी झाल्याची टीका केली होती. राहुल गांधी युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. संघटनेचे महत्त्व पटवून देताना राहुल यांनी जोत्यिरादित्य शिंदेंचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, ‘मी शिंदेंना म्हणालो होतो, की आपण मेहनत करा एक दिवस नक्की मुख्यमंत्री व्हाल. मात्र, त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आता ते भाजपमध्ये बॅकबेंचर आहेत. तसेच ते तिथे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना परतावे लागेल,’ असे राहुल गांधी म्हणाले होते.

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

TAGGED: #Rahulgandhi #political #rajasthan, #काँग्रेसमध्ये #एवढीचिंता #राहुलगांधी #सिंधिया #टोला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिग ब्रेकिंग – जळगावमध्ये तीन दिवस कडक जनता कर्फ्यू
Next Article उन्हाळा सुट्टीतही सोलापुरात सुरु राहणार शाळा; फक्त 15 दिवस सुट्टी

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?