नवी दिल्ली, 30 जून (हिं.स.)
कैलास
मानसरोवर यात्रा आजपासून सुरू झाली आहे. तब्बल ५ ते ६ वर्षांच्या अंतरानंतर ही यात्रा सुरू
झाली आहे. कैलाश मानसरोवर हे हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख धर्माच्या लोकांसाठी एक पवित्र
तीर्थक्षेत्र आहे. ते जगातील सर्वात कठीण यात्रांपैकी एक मानले जाते. या वर्षी
एकूण ७५० यात्रेकरूंना कैलाश मानसरोवराची यात्रा करण्याची परवानगी देण्यात आली
आहे.
कैलास
मानसरोवर यात्रेचे मार्ग भारतातील उत्तराखंड आणि सिक्कीम येथून आहेत. पहिला मार्ग
उत्तराखंडमधील लिपुलेख आणि दुसरा मार्ग सिक्कीममधील नाथुला खिंडीतून जातो.
सिक्कीमहून जाणारे प्रवासी कैलास मानसरोवर भवन येथून बसने दिल्ली विमानतळावर
जातात. तेथून ते गंगटोकला पोहोचतात आणि त्यानंतर पुढील प्रवास सुरू होतो.
लिपुलेखहून येणारे प्रवासी बसने उत्तराखंडला येतात आणि नंतर त्यांचा पुढील प्रवास
सुरू करतात.
कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करण्यासाठी सुमारे २२ दिवस लागतात.त्यापैकी १४ दिवस भारतात आणि ८ दिवस तिबेटमध्ये
घालवले जातात. या प्रवासाच्या सुरक्षेची जबाबदारी इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस अर्थातच
आयटीबीपीकडे
आहे. कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यापूर्वी यात्रेकरूंना कैलास मानसरोवर भवनमध्ये
सुमारे ४-५ दिवस राहावे लागते. येथून त्यांना आरोग्य तपासणीसाठी दिल्लीला नेले
जाते. फक्त तंदुरुस्त असलेल्या यात्रेकरूंनाच परवानगी देण्यात येते.
—————