Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई ‘सोडली’ म्हणणा-या कंगनाने राज्याच्या विषयात सोयीनुसार घेतली ‘उडी’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुडमहाराष्ट्र

मुंबई ‘सोडली’ म्हणणा-या कंगनाने राज्याच्या विषयात सोयीनुसार घेतली ‘उडी’

Surajya Digital
Last updated: 2020/10/13 at 11:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मुंबई पोलिसासह ठाकरे सरकारला बाबरसेना असा शेरा मारणा-या कंगनाने हाताश होऊन मुंबई सोडल्याचे ट्वीट केले. मात्र कंगनाचा मुंबईचा लळा काही केल्या कमी होताना दिसत नाही. तिने परत सोयीनुसार राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रव्यवहार वादात उडी घेतलीय.

राज्यातील हॉटेल, बार उघडण्यात आले असताना मंदिरं बंद का? असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तसेच, या पत्रातून राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हणत पत्रानेच उत्तर दिले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा ठाकरे सरकावर बोचरी टीका केली आहे. याबाबत कंगनाने ट्विट केले आहे. राज्यपालांकडून गुंडा सरकारला प्रश्न विचारला आहे, याबद्दल चांगले वाटले. गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट उघडले. मात्र, राजनीतिकदृष्ट्या मंदिरं बंद ठेवली. बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देत आहे, असे कंगना राणौतने ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून कंगना राणौतने याआधी मुंबई पोलिस आणि राज्य सरकारवरही बोचरी टीका केली होती. कंगना राणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत शिवसेनेशीही पंगा घेतला आहे. याशिवाय, कंगना राणौत मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगना राणौतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यामुळे एका नव्या वादास तोंड फुटले होते. त्यानंतर आता पुन्हा ठाकरे सरकारवर टीका केल्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय

मुंबई विद्यापीठाचा निर्णय: विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेण्याची संधी

सुशांतसिंग राजपूत प्रकरण : सीबीआय क्लोजर रिपोर्टवर रिया चक्रवर्तीला न्यायालयाची नोटीस

शिवराज्याभिषेक दिन हा देशातील सर्वात मोठा उत्सव असावा – संभाजी भिडे

आश्रमशाळेतील पाण्याची टाकी कोसळली; १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी

TAGGED: #कंगना #मुंबई #राज्यपाल #मुख्यमंत्री #पत्रव्वहारात #उडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारतीय टपाल खात्यात मोठी भरती; सर्व जागा महाराष्ट्र विभागासाठीच
Next Article राज्यपालांची भाषा घटनाविरोधी; गोव्यात असे पत्र दिले का? काँग्रेसचा पण ‘सवाल’

Latest News

पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
देश - विदेश July 30, 2025
crime
सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी
सोलापूर July 30, 2025
आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा
राजकारण July 30, 2025
लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
देश - विदेश July 30, 2025
जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंध नदीत कोसळली; सर्व जवान सुखरूप, चालक गंभीर जखमी
देश - विदेश July 30, 2025
पंतप्रधान मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीतून किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरीत करणार
देश - विदेश July 30, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय
महाराष्ट्र July 30, 2025
ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूबवर बंदी; सोशल मीडियावर सर्वप्रथम असा कायदा
देश - विदेश July 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?