पटना : बिहारमधील खजूरबानी विषारी दारू मृत्यूप्रकरणी न्यायालयाने 9 आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली, तर 4 महिला आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गोपालगंज अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
गोपालगंज पोलीस स्थानक परिसरातील खजुरबानी येथे 16 ऑगस्ट 2016 रोजी विषारी दारू प्यायल्याने 19 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 6 लोक कायमचे अंध झाले होते. या प्रकरणी खजुरबानी गावच्या नगीना पासी, रुपेश शुक्ला यांच्यासह 14 जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. सुनावणीदरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
न्यायालयाने फाशी शिक्षा सुनावताच दोषींच्या कुटुंबीयांनी न्यायालयाच्या परिसरातच टाहो फोडला. गोपालगंजच्या एडीजे दोन या न्यायालयाने हा निकाल दिला.
* अमृताचं आयुष्य उद्ध्वस्त
अमृता यांचे वय आज 35 वर्षे आहे आणि त्यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. अमृता या आता आपल्या माहेरी आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. त्यांच्या घरची परिस्थिती वाईट आहे. विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात अमृताचे पती अनिल राम यांचाही समावेश होता.
या विषारी दारूकांडमध्ये खजूरबानी येथील 35 वर्षीय अमृताचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. दोन मुलं आणि दोन मुली असलेल्या अमृताच्या पतीचाही त्या 19 मृतांमध्ये समावेश होता. पतीच्या मृत्यूनंतर तिने सासर सोडले आणि आता ती आपल्या माहेरी आई-वडील आणि मुलांसोबत राहते. सरकारने चार लाखांची मदत दिली, मात्र ही रक्कम बँकेमध्ये फिक्स डिपॉझीट म्हणून ठेवली व महिन्याला 900 रुपये अमृता यांना मिळू लागले. मात्र 900 रुपयांमध्ये चार मुलांचे पोट कसे भरायचे हा प्रश्न त्यांना पडला असून सरकारकडून मदत मिळण्याची आशा त्यांना आहे.
शशी चौहान या 28 वर्षीय तरुणाचा विषारी दारुने मृत्यू झाला. कुटुंबाने तरुण मुलगा गमावला. पण या पीडित कुटुंबाला अद्याप सरकारची मदत मिळालेली नाही. मुलगा गेल्यापासून घरात आजारपण आलं आहे, असं मृत शशीचे वडील विजय चौहान म्हणाले.