Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यपालांना ठाकरे शैलीत लिहलेल्या पत्रावरुन फडणवीस, किरीट सोमय्यांनी केली मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राज्यपालांना ठाकरे शैलीत लिहलेल्या पत्रावरुन फडणवीस, किरीट सोमय्यांनी केली मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

Surajya Digital
Last updated: 2020/10/13 at 7:21 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कोरोनामुळे राज्यातील सर्व परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ही सर्व परिस्थिती हाताळताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. परिणामी त्यांचा तोल जाऊ लागला आहे. मला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते, असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. या पत्राला मुख्यमंत्र्यांकडूनही चोख भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या चोख भाषेत ठाकरे शैलीत प्रत्युत्तर दिले. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे त्यांनी राज्यपालांना ठणकावून सांगितले. या मुद्द्यावरुनही किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी खूप मोठी तडजोड केली.

अशातच कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने उद्धव ठाकरे यांना सध्या प्रत्येक गोष्टीचा राग येत आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना त्यांचा तोल गेला. मला मुख्यमंत्र्यांविषयी सहानुभूती आहे. मात्र, राज्यपालांसारख्या वयस्कर व्यक्तीशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अहंकारी भाषेचा वापर करणे, कितपत योग्य आहे, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.

* राज्यपालांना दिलेले उत्तर खेदजनक – फडणवीस

राज्य सरकारने मदिरालये सुरु केली. इतकेच नव्हे तर पर्यटन विभागाच्या पत्राचा आधार घेत वेळही वाढवून दिला. तर मग मंदिरांचे एवढे वावडे का? अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. देशातील सर्व राज्यांनी मंदिरे उघडली. कुठल्याही राज्यात मंदिरे खुली केल्याने कोरोना पसरल्याचे उदाहरण नाही. राज्यपालांना प्राप्त होणारी निवेदने ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्याचप्रमाणे मंदिरे उघडण्यासाठीचे निवेदन पाठवले होते. मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेले उत्तर खेदजनक आहे. या तीन पक्षांच्या सरकारमध्ये स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारी शिवसेना देखील आहे. त्यांच्या राज्यात इतका मोठा अन्याय का?” असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

You Might Also Like

आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय

मुंबई विद्यापीठाचा निर्णय: विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेण्याची संधी

“परभणी जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा भक्कमपणे उभी करा” – हर्षवर्धन सपकाळ यांचा कार्यकर्त्यांना संदेश

सुशांतसिंग राजपूत प्रकरण : सीबीआय क्लोजर रिपोर्टवर रिया चक्रवर्तीला न्यायालयाची नोटीस

TAGGED: #मुख्यमंत्री #राज्यपाल #पत्र #फडणवीस #सोमय्या #खेदजनक #तोल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिशाभूल करणा-या या कोडिंग जाहिरातींना बळी पडू नका; शिक्षणमंत्र्यांचे आवाहन
Next Article “तुम्ही सतत देशद्रोही-देशद्रोही म्हणालं तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीन”

Latest News

पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
देश - विदेश July 30, 2025
crime
सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी
सोलापूर July 30, 2025
आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा
राजकारण July 30, 2025
लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
देश - विदेश July 30, 2025
जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंध नदीत कोसळली; सर्व जवान सुखरूप, चालक गंभीर जखमी
देश - विदेश July 30, 2025
पंतप्रधान मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीतून किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरीत करणार
देश - विदेश July 30, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय
महाराष्ट्र July 30, 2025
ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूबवर बंदी; सोशल मीडियावर सर्वप्रथम असा कायदा
देश - विदेश July 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?