Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पावरुन जनतेची राज्य सरकारकडून दिशाभूल; आरोपाचा रोख बारामतीकडे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरराजकारण

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पावरुन जनतेची राज्य सरकारकडून दिशाभूल; आरोपाचा रोख बारामतीकडे

Surajya Digital
Last updated: 2020/08/25 at 5:20 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अकलूज : कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पातून कोणत्याही दुष्काळी भागाचा फायदा होणार नाही. कारण राज्य सरकार ११५ टीएमसी पाण्याच्या नावाखाली केवळ ७ टीएमसी नीरा- भीमा स्थिरीकरणाचे काम करत आहे. वास्तविक पाहता हे पाणी एका बड्या नेत्याच्या तालुक्याला वापरायला मिळणार असल्याने राज्य सरकारने जनतेची दिशाभूल सुरू केली असल्याचा गंभीर आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे.

या आरोपाचा रोख बारामतीकडे असून सध्या केवळ नीरेतील जादा होणारे पाणी उजनीत आणण्याची कामे अंतिम टप्प्यात आहे. तर मराठवाड्याकडे पाणी नेण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे असल्यामुळे त्यांच्या आरोपांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

वास्तविक या प्रकल्पात कृष्णेतून १ थेंबही पाणी येणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील दुष्काळी जनतेला मिळणारे हे पाणी पुन्हा एक दिवास्वप्नच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुराचे पाणी दुष्काळी भागात आणले जाईल हे सांगणंही पूर्णपणे चुकीचे असून आताही सांगली कोल्हापुरातील पुराचे पाणी कर्नाटक आणि आंध्राकडेच वाहून जाणार असल्याचा दावा मोहिते पाटील यांनी केला आहे.

वास्तविक विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सुरुवात झाली होती. नंतरच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या प्रकल्पाची उघड चेष्टा सुरु करुन भाषणात गुंडाळून ठेवला आहे. याच मुद्यासाठी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अकलूजच्या जाहिर सभेत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा शब्द मोहिते पाटील यांना दिला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या प्रकल्पाला पाणी वाटप लवादाची मान्यता नसल्याचे कारण राज्य सरकार कडून पुढे केले जात आहे. मात्र या सरकारने चांगला वकील देऊन बाजू का मांडली, नाही असा सवाल मोहिते पाटील यांनी उपस्थित केला आहे. या शिवाय राज्यपालांच्या अनुशेषाचा निकषामुळेही याच्या पहिल्या चार टप्प्यांची कामे होत नसल्याच्या आक्षेपाला उत्तर देतांना यासाठी वेगळ्या मार्गाने निधी उभारणे शक्य असल्याचे मोहिते पाटील यांनी नमूद केले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #कृष्णाभीमा #स्थिरीकरण #गंभीरआरोप #धैर्यशील #मोहितेपाटील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑनलाईन शिक्षणामुळे शैक्षणिक विषमतेचा धोका; जानेवारी महिन्यापासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव
Next Article महाड इमारत दुर्घटनेत दहाजणांचा मृत्यू; बिल्डर, आर्किटेक्टवर फौजदारी गुन्हा, विशेष पथकाची नेमणूक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?