Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कृषी सुधारणा विधेयक मंजूर तर दुसरीकडे विधेयकाच्या विरोधात शेतक-याने केले विष प्राशन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशशिवार

कृषी सुधारणा विधेयक मंजूर तर दुसरीकडे विधेयकाच्या विरोधात शेतक-याने केले विष प्राशन

Surajya Digital
Last updated: 2020/09/18 at 12:17 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : मोदी सरकारने विरोध डावलून दोन कृषीची सुधारित विधेयके मंजूर केलीत. दरम्यान, ही विधयके शेतकरी विरोधात असल्याचे सांगत एनडीएचा घटक पक्ष शिरोमणी अकली दल नाराज झाला आहे. पक्षाच्या खासदार आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे ही दोन्ही विधयके मंजूर  झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केल आहे. ऐतिसासिक कृषी सुधारित बिल मंजूर होणे हे देशातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी महत्वाचा क्षण आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, २०२०, शेतमाल हमी भाव आणि शेती सेवा करार (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२० हे विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर झाले. याचा निषेध करत विरोधी पक्षांनी लोकसभेतून सभात्याग केला. तर  केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

देशातील कृषी सुधारणेसाठी दोन महत्त्वाची विधेयके लोकसभेत सादर करण्यात आली, असे मोदी सरकारकडून सांगण्यात आले. शेतकरी उत्पादन व वाणिज्य (पदोन्नती आणि सरलीकरण) विधेयक, २०२० आणि शेतकर्‍यांचे (सबलीकरण आणि संरक्षण) कृषी सेवांवरील हमी भाव आश्वासन आणि करार विधेयक, २०२० – लोकसभेने मंजूर केले. शेतकरी स्वतःच्या मर्जीचा मालक असेल. शेतकऱ्याला आपला शेतमाल थेट विकण्याचे स्वातंत्र्य असेल, एमएसपी कायम राहील. कर न लावल्यामुळे शेतकर्‍यांना अधिक भाव मिळेल आणि नागरिकांनाही कमी किंमतीत मालही मिळेल. खासगी गुंतवणूकीमुळे शेतीला गती येईल, रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था बळकट होईल, असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.

तर मोदी यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, ही दोन्ही बिले एक ऐतिहासिक क्षण आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण क्षण आहे. ही विधेयके शेतकऱ्यांसाठी चांगली आहेत. मध्यस्त आणि सर्व अडचणीतून आता शेतकऱ्याची सुटका होणार आहे. जय किसान, असे मोदी यांनी म्हटले आहे.

ही दोन्ही बिले कृषी क्षेत्रात संपूर्ण बदल घडवून आणतील, शेतकऱ्यांच्या जीवनात एक क्रांतिकारक बदल घडवून आणतील. शेतीत खासगी गुंतवणूकीमुळे वेगवान वाढ होईल आणि रोजगाराच्या संधीही वाढतील, कृषी क्षेत्राच्या बळकट अर्थव्यवस्थेमुळे देशाची आर्थिक स्थिती आणखी सुधारेल, असे केंद्र सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे.

* विधेयकाच्या विरोधात शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी तीन विधेयकं आणणार आहे. या विधेयकांना लागू करू नये यासाठी शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे. दरम्यान, यामध्ये आता एक धक्कादायक अशी घटना घडली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या घराबाहेर एका शेतकऱ्याने विष प्राशन केल्यानं खळबळ उडाली आहे. बादल गावातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रकृती बिघडल्यानं त्या शेतकऱ्याला साथीदारांनी पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं आहे. संबंधित शेतकऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजते. पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री बादल यांच्या घराबाहेर गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. देशभरातल्या शेतकरी संघटना याला विरोध करत आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि हरियाणातले शेतकरी या नवीन विधेयकांना सर्वात जास्त विरोध करत आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #कृषी #सुधारणा #विधेयक #मंजूर #विषप्राशन #शेतकरी #आत्महत्या #प्रयत्न
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकरी विरोधी विधेयकाला एनडीएतील घटक पक्षाचा विरोध; केंद्रीय मंत्रिपदाचा दिला राजीनामा
Next Article रावसाहेब दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट; साखर कारखान्याच्या विषयावर झाली चर्चा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?