Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: परीक्षा अहवालातील शिफारशीबाबत कुलगुरुंच अनभिज्ञ; अहवालाची प्रत विद्यापीठातील कुलगुरुंना मिळालीच नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

परीक्षा अहवालातील शिफारशीबाबत कुलगुरुंच अनभिज्ञ; अहवालाची प्रत विद्यापीठातील कुलगुरुंना मिळालीच नाही

Surajya Digital
Last updated: 2020/09/05 at 10:08 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : परीक्षांबाबत नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी  शुक्रवारी जाहीर केला, मात्र राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंनाच या अहवालाची प्रत देण्यात आलेली नाही. ११ शिफारसी असलेला अहवालापासून परीक्षा प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणा-या राज्यातील विद्यापीठ कुलगुरुंनाच आणखी मिळाली नाही.

प्राधिकरणांच्या मंजुरीने विद्यापीठांच्या परीक्षांबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊन, त्यानंतर पुढील १५ ते २० दिवसांमध्ये परीक्षांचे नियोजन करण्याचे आव्हान कुलगुरूंना पेलावे लागणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबरपूर्वी निकाल जाहीर करावा लागणार आहे. प्रत्येक विद्यापीठाला नव्याने स्वीकारलेल्या परीक्षा पद्धतीनुसार हजारो प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार आहेत. विद्यापीठांमध्ये सद्य:स्थितीत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्याही मर्यादित आहे. यामुळे कुलगुरुंचीच खरी परीक्षा लागल्याचे दिसतंय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

परीक्षांबाबत नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी  काल शुक्रवारी जाहीर केला, मात्र राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंनाच या अहवालाची प्रत देण्यात आलेली नाही. अगदी समितीच्या सदस्यांनाही अंतिम अहवालाची प्रत देण्यात आली नसल्याचे समजते. ‘घरबसल्या’ परीक्षा देण्याची घोषणा सामंत यांनी केली असली तरी अशी शिफारस करण्यात आली नसून परीक्षा घेण्याचे पर्याय सुचवण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.

राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत नेमण्यात आलेल्या विद्यापीठांचे आजी-माजी कुलगुरू, अधिकारी यांच्या समितीने परीक्षा कशा घ्याव्यात याबाबतचा अहवाल शासनाला दिला. अहवालात ऑनलाइन, बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असे विविध पर्याय सुचवण्यात आले आहेत. ११ शिफारसी असलेला अहवाल सामंत यांनी जाहीर केला. त्यानुसार पुढील दोन दिवसांत प्राधिकरणांच्या बैठका घेऊन विद्यापीठांनी निर्णय शासनाला कळवायचा आहे.

प्राधिकरणांच्या मंजुरीनुसारच परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. मात्र राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंनाच अहवाल देण्यात आलेला नाही. इतकेच नाही तर समितीच्या सदस्यांनाही अंतिम अहवाल देण्यात आलेला नसून मंत्र्यांनी अहवाल जाहीर केला तरी त्यावर सर्व सदस्यांची स्वाक्षरीही नसल्याचे सूत्रांनी सांगितले. गुलदस्त्यात ठेवलेल्या अहवालाच्या आधारे प्राधिकरणांमध्ये निर्णय कसा घ्यायचा, असा प्रश्न कुलगुरूंना पडला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #परीक्षा #कुलगुरु #अनभिज्ञ #
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कंगना ट्वीट प्रकरणात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने घेतली उडी
Next Article कंगनाला मुंबईकराच्या विरोधानंतर उपरती, म्हणाली मुंबई माझ्या आईसारखी; जय मुंबई – जय महाराष्ट्र

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?