लातूर, 12 सप्टेंबर : लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेव कराड या ३५ वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून मांजरा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे
सध्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात घडणाऱ्या घडामोडी सर्वसामान्य ओबीसीला अस्वस्थ करणाऱ्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण संविधान आणि कायद्यामुळे नक्की न्याय मिळेल,त्यासाठी लढावं लागणार आहे. त्याला आपण खंबीर आहोत. त्यामुळे कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये, असे महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बांधवांना मंत्री छगन भुजबळ यांनी कळकळीचे आवाहन आहे