Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: परीक्षेला पोहचण्याच्या आतच आयुष्याचा पेपर संपला, 50 जणांना जलसमाधी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

परीक्षेला पोहचण्याच्या आतच आयुष्याचा पेपर संपला, 50 जणांना जलसमाधी

Surajya Digital
Last updated: 2021/02/17 at 12:49 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

भोपाळ : मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात मंगळवारी बसला अपघात झाला होता, बसमध्ये 54 प्रवासी होते. यातील बहुतांश विद्यार्थी होते, ते रेल्वेची परीक्षा देण्यासाठी जात होते. मात्र, ही परीक्षा देण्यापूर्वीच आयुष्याचा पेपर संपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सकाळची वेळ असल्याने प्रवासी झोपेत होते. त्यामुळे त्यांना हालचाल करता आली नाही. आतापर्यंत 50 प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेणं सुरु आहे.

मध्य प्रदेशात मंगळवारी एक बस कालव्यात कोसळून अपघात  झाला होता. या अपघातात बसमधील 50 प्रवाशांचा कालव्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यापैकी बहुतांश जण विद्यार्थी होते. हे विद्यार्थी रेल्वेची परीक्षा देण्यासाठी जात होते. मात्र, ही परीक्षा देण्यापूर्वीच या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पेपर संपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ही बस मंगळवारी सकाळी सतानच्या दिशेने जात होती. तेव्हा चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस कालव्यात जाऊन कोसळली. बस खोल कालव्यात पडल्यानंतर बुडायला लागली. तेव्हा सात प्रवाशांनी बसच्या बाहेर पडण्यात यश मिळवलं. हे प्रवासी पोहत कालव्याच्या बाहेर पडले. मात्र, इतर प्रवासी बसमध्येच अडकून पडल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या भरपाईची घोषणा केली आहे.

या बसमधील लोक सकाळची वेळ असल्याने झोपेत होते. त्यामुळे बस पाण्यात पडल्यानंतर या लोकांना झटपट हालचाल करता आली नाही. कालव्यातील पाण्याचा प्रवाहदेखील जोरदार होता. त्यामुळे प्रवाशांना स्वत:चा जीव वाचवायची संधी मिळाली नाही. एरवी रीवा आणि सतानला जाणाऱ्या या बसमध्ये फारशी गर्दी नसते. मात्र, परीक्षा असल्यामुळे बसमध्ये विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. तसेच सतानला जाताना ही बस छुहिया घाटातून जाते. मात्र, मंगळवारी ही बस नेमकी कालव्याच्या मार्गाने गेली. ही बस अत्यंत वेगात होती. रस्त्यावरील एक गतीरोधक पार करताना बसचे संतूलन बिघडले आणि ती कालव्यात जाऊन कोसळली. त्यावेळी कालव्यात बरेच पाणी असल्याने बस लगेच बुडाली. यामध्ये 50 प्रवाशांचा करुण अंत झाला.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Lifepaper #endedjust #reachingtheexam #drowning #50people, #परीक्षेला #पोहचण्याच्याआतच #आयुष्याचा #पेपरसंपला #50जणांना #जलसमाधी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत, कू अ‍ॅपचा वापर वाढवण्यावर भर
Next Article तुरुंगवास भोगत असलेल्या आसारामची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?