Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रेमविवाहासाठी निघालेल्याचा बंगळुरु महामार्गावर अपघात; बार्शीतून गेलेले चौघे ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

प्रेमविवाहासाठी निघालेल्याचा बंगळुरु महामार्गावर अपघात; बार्शीतून गेलेले चौघे ठार

Surajya Digital
Last updated: 2020/09/20 at 10:42 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : सोलापूर- बंगळुरु महामार्गावर वाळूचा ट्रक आणि कार यांची समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात चौघे ठार झाले आहेत. अपघातग्रस्त कार बार्शीतील असून मृतामध्ये दोघे बार्शीतील तर दोघे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील रहिवाशी आहेत. ही कार बार्शी येथून प्रवाशी घेवून गेली होती.

अपघातस्थळावरच तिघांचा मृत्यू झाला तर अल्पवयीन मुलगी अपघातानंतर काही तासांनी उपचार घेत असताना मरण पावली. येथील संभाजी नगर येथील रहिवाशी असलेला प्रकाश बाळासाहेब बनसोडे हा आपल्या इंडिका कारमधून प्रवाशी वाहतूक करत असे. त्याचा मित्र संदीप कांबळे याने त्यास कळंब तालुक्यातील एक भाडे आणले होते. एक युवक आणि त्याच्यासमवेतच्या अल्पवयीन मुलीला बेंगलोर येथे पोहचवयाचे भाडे त्यांनी स्विकारले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लांबचा पल्ला असल्याने तो स्वत:ही बदली चालक म्हणून बनसोडे याच्यासमवेत गेला होता. बंगळुरु महामार्गावर कोप्पल जिल्ह्यातील कुष्टगी शहरातून त्यांची कार जात असताना वाळू भरलेला ट्रक चुकीच्या मार्गाने येवून त्यांना धडकला. त्यामुळे वेगात असलेल्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

या अपघातात प्रकाश बनसोडे, संदीप कांबळे व कळंब येथील तो युवक डोक्याला आणि सर्वांगाला प्राणघातक जखमा होवून जागेवरच ठार झाले तर ती मुलगी अत्यवस्थ झाली. अपघातानंतर कुष्टगी पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली आणि मुलीला उपचारासाठी दाखल केले. ते दोघेही घरातून पळून आलेले होते व बंगळुरु येथे विवाह करण्यासाठी जात होते, असे सांगण्यात येत आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #प्रेमविवाह #निघालेले #बंगळुरु #अपघात #कळंब #चारठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपाकडून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी तर आता देशमुखांचा घूमजाव
Next Article अखेर वादग्रस्त शेती विधेयक गोंधळात मंजूर; उपसभापतींसमोरील माईक तोडून नेण्याचा प्रयत्न

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?