Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रेमविवाहासाठी निघालेल्याचा बंगळुरु महामार्गावर अपघात; बार्शीतून गेलेले चौघे ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

प्रेमविवाहासाठी निघालेल्याचा बंगळुरु महामार्गावर अपघात; बार्शीतून गेलेले चौघे ठार

Surajya Digital
Last updated: 2020/09/20 at 10:42 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : सोलापूर- बंगळुरु महामार्गावर वाळूचा ट्रक आणि कार यांची समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात चौघे ठार झाले आहेत. अपघातग्रस्त कार बार्शीतील असून मृतामध्ये दोघे बार्शीतील तर दोघे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील रहिवाशी आहेत. ही कार बार्शी येथून प्रवाशी घेवून गेली होती.

अपघातस्थळावरच तिघांचा मृत्यू झाला तर अल्पवयीन मुलगी अपघातानंतर काही तासांनी उपचार घेत असताना मरण पावली. येथील संभाजी नगर येथील रहिवाशी असलेला प्रकाश बाळासाहेब बनसोडे हा आपल्या इंडिका कारमधून प्रवाशी वाहतूक करत असे. त्याचा मित्र संदीप कांबळे याने त्यास कळंब तालुक्यातील एक भाडे आणले होते. एक युवक आणि त्याच्यासमवेतच्या अल्पवयीन मुलीला बेंगलोर येथे पोहचवयाचे भाडे त्यांनी स्विकारले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लांबचा पल्ला असल्याने तो स्वत:ही बदली चालक म्हणून बनसोडे याच्यासमवेत गेला होता. बंगळुरु महामार्गावर कोप्पल जिल्ह्यातील कुष्टगी शहरातून त्यांची कार जात असताना वाळू भरलेला ट्रक चुकीच्या मार्गाने येवून त्यांना धडकला. त्यामुळे वेगात असलेल्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

या अपघातात प्रकाश बनसोडे, संदीप कांबळे व कळंब येथील तो युवक डोक्याला आणि सर्वांगाला प्राणघातक जखमा होवून जागेवरच ठार झाले तर ती मुलगी अत्यवस्थ झाली. अपघातानंतर कुष्टगी पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली आणि मुलीला उपचारासाठी दाखल केले. ते दोघेही घरातून पळून आलेले होते व बंगळुरु येथे विवाह करण्यासाठी जात होते, असे सांगण्यात येत आहे.

You Might Also Like

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले

भीमा नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उजनी धरणाचा विसर्ग घटल्याने पंढरपूरमधील पुरधोका टाळता आला

सोलापूर जिल्ह्यात ४१५४ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी; “एक गाव-एक गणपती” चालना

TAGGED: #प्रेमविवाह #निघालेले #बंगळुरु #अपघात #कळंब #चारठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपाकडून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी तर आता देशमुखांचा घूमजाव
Next Article अखेर वादग्रस्त शेती विधेयक गोंधळात मंजूर; उपसभापतींसमोरील माईक तोडून नेण्याचा प्रयत्न

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?