सोलापूर : किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं? आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे, असं राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे. पण आम्हालाही आमचं अस्तित्व टिकवायचं आहे, असं जानकर पंढरपुरात म्हणाले. राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांची भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे.
भाजपने वीजबिला संदर्भात आंदोलन जाहीर केलं आहे. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आम्ही मात्र भाजपसोबतच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, असं महादेव जानकर यांनी म्हटलंय. दरम्यान, आमचा पक्ष वाढला तर कार्यकर्त्यांनाही ताकद मिळेल, असंही महादेव जानकर म्हणालेत.
राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांची भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे.
त्याचाच भाग म्हणून जानकर यांनी भाजपच्या वीजबिल आंदोलनातून माघार घेतली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचे? आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे, असं सांगत महादेव जानकर यांनी आगामी काळात भाजपासून अंतर ठेवून राजकारण करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे. पण आम्हालाही आमचं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होऊ शकत नाही. किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं? आमचा पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे. आमचा पक्ष वाढला तर कार्यकर्त्यांनाही ताकद मिळेल, असं जानकर म्हणाले. भाजप वीज बिलासंदर्भात आंदोलन करत असेल तर आमचा त्याला पाठिंबाच राहील. पण त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपने महादेव जानकर यांच्या पक्षाकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नाही. तसेच विधानपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जानकरांच्या पक्षाला जागा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे जानकर हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. मधल्या काळात जानकर यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यालयावर ईडीच्या धाडी पडल्या होत्या. त्यामुळे रासपमध्ये भाजपविरोधातील नाराजी अधिकच वाढली होती. त्याचा परिणाम म्हणूनही जानकरांनी भाजपपासून अंतर ठेवून राजकारण करण्यास सुरुवात केल्याचं राजकीय विश्लेषकाचे म्हणणे आहे.