Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाविकास आघाडीचा ‘फॉर्म्युला’ अन् युतीचे ‘भिजत घोंगडे’ : लोकसभा जागांची खेचाखेची
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडीचा ‘फॉर्म्युला’ अन् युतीचे ‘भिजत घोंगडे’ : लोकसभा जागांची खेचाखेची

Surajya Digital
Last updated: 2023/05/27 at 11:29 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्दयावरुन महाविकास आघाडीत १६ -१६ – १६ हा फॉर्म्युला ठरत असला तरी ठाकरे गटाने २३ जागांवर दावा केल्याने आघाडीत त्यांचा फॉर्म्युला’ बिघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर इकडे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये जागा वाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Mahavikas Aghadi’s ‘formula’ and alliance’s ‘Bijat Ghongde’: The battle for Lok Sabha seats

 

कारण, एकनाथ शिंदे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २०१९ मध्ये लढवलेल्या २३ पैकी २२ जागांवर दावा केला आहे. यावर पक्षविस्ताराच्या बाबतीत कायम आक्रमक असलेला भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिंदे गटाला २२ जागा दिल्या तर ‘भाजपचे मिशन ४५’ चे काय ?, हा प्रश्न भाजप नेत्यांना सतावत आहे. त्यामुळे युतीचे ‘घोंगड’ भिजतच पडलंय.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत त्यांनी म्हटले की, ‘लोकसभेच्या २२ जागा लढवण्यासंदर्भात चर्चा केली आहे. यापैकी १३ खासदार हे सध्या शिवसेनेसोबत (शिंदे गट) आहेत. तर उर्वरित खासदार ठाकरे गटासोबत असून या जागांचा आढावा घेतला जाईल. यानंतर त्याठिकाणी उमेदवार उतरवण्याच्या दृष्टीने तयारी केली जाईल.

 

लोकसभेच्या या २२ जागांवर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केले.’ तसेच खासदारांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी १३ विद्यमान खासदारांसोबत चर्चा केली. या जागा पुन्हा जिंकण्यासाठी काय करावे लागेल, यावर चर्चा झाली. लोकसभेच्या या १३ जागांसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी संबंधित मतदारसंघांमधील भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची बैठक होईल, असेही सांगण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या सर्व लोकसभा मतदारसंघातील विकास राजकारण्यांचा ‘मेंदू कुठे गेलाय ?

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

भाजप आणि शिवसेना यांनी २०१९ साली युतीमध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजप-शिवसेनेने महाराष्ट्रातील ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपने २५ जागा लढवून २३ जागांवर विजय मिळवला होता. तर शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी १८ जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेच्या अनुक्रमे २५ आणि १९ जागा लढवल्या होत्या. तर चार जागांवर घटकपक्षाचे उमेदवार उभे होते.

दरम्यान महाविकास आघाडीत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षात समसमान जागावाटपावर चर्चा होत असली तरी ते ठाकरे गटाला मान्य नाही. त्यांनी २३ जागांवर दावा केला आहे. यात महाविकास आघाडीत धुसफुस होण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या २ व ३ जूनला काँग्रेस राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मुंबई आढावा घेणार आहे.

● सापत्नाची वागणूक : किर्तीकर

 

भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचे खळबळजनक वक्तव्य खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात भाजप – शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली होती.

मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी अहमदनगरमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

 

 

● किर्तीकर असे बोललेच नाहीत : फडणवीस

‘शिवसेना (शिंदे गट) खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपाबद्दल केलेल्या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष आहोत. तरीही, भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे, असं वक्तव्य गजानन कीर्तिकरांनी केलं आहे.

 

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (२६ मे) अहमदनगरमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते. तेव्हा गजानन कीर्तिकरांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. गजानन कीर्तिकरांनी असं कुठेही म्हटलं नाही. या सर्व कल्पोकल्पीत बातम्या आहेत’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

You Might Also Like

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी

अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे

TAGGED: #MahavikasAghadi #formula #alliance #BijatGhongde #battle #LokSabha #seats, #महाविकासआघाडी #फॉर्म्युला #युती #भिजतघोंगडे #लोकसभा #जागा #खेचाखेची #राजकीय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जून – जुलैमध्ये शिक्षक भरती; ‘अंतरिम’नंतर संचमान्यता होणार अंतिम
Next Article दुचाकी अडवून महिलेस हॉकी स्टिकने मारहाण; रंगभवन परिसर येथील घटना

Latest News

भारत- पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे आयपीएलचा चालू हंगाम स्थगित
देश - विदेश May 9, 2025
चंद्रकांत पाटील यांनी ‍नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस
Top News May 9, 2025
थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?