Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे रद्द
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे रद्द

Surajya Digital
Last updated: 2021/07/22 at 8:34 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व सार्वजनिक व्यवस्था कोलमडली आहे. यात रेल्वे प्रशासनानेही मोठा निर्णय घेतला आहे. 33 रेल्वे दुसरीकडे वळवण्यात आल्या आहेत. 51 गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड करण्यात आल्या आहेत. तसेच 48 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुढील तीन दिवस जोरदार पाऊस असेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

नांदेड जिल्ह्यासह राज्यभरात होणाऱ्या धुवांधार पावसामुळे दक्षिणमध्ये रेल्वेच्या नांदेड ते मुंबई जाणाऱ्या रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे कसारा टिटवाळा रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. उंबरमाळी स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या बरोबरीने पाणी पोहोचले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर हे स्टेशन पाण्याखालीही जावू शकते.

मुसळधार पावसामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे वाहतूक बंद झालीय. यामुळे कामावर ये – जा करणा-या कामगारांचे हाल होत आहेत. उंबरमाळी स्टेशनमध्ये पाणी घुसल्याने वाहतूक बंद आहे. याचमुळे टिटवाळा ते कसारा लोकल वाहतूक बंद झाली आहे. यातही दिलासादायक बाब म्हणजे कर्जतपर्यंत वाहतूक बंद असली तरी अंबरनाथपर्यंत रेल्वे वाहतूक सुरु आहे.

* घरात पाणी शिरले

उंबरमाळी स्टेशनमध्ये पाणी घुसल्याने ट्रॅकवर पाणी, गाळ साचल्याने लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. वालधुनी नदी पात्रतवाढ झाल्याने नदी लगत असलेल्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.

कल्याण-डोंबिवलीत रात्रभर जोरदार पावसामुळे कल्याणमध्ये सखल भागात पाणी साचले. वालधुनी नदीपात्रत पाण्याची वाढ झाल्याने नदी लगत असलेल्या अशोक नगर शिवाजीनगरमध्ये घरात पाणी घुसले.

* कंटेनर अडकल्याने कोंडी

सायन-किंग्ज सर्कल इथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी आहे. किंग्ज सर्कल इथे पादचारी पुलाखाली कंटेनर अडकल्याने रस्ता बंद आहे. बाजूच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. मात्र धीम्या गतीने वाहतूक  असल्याने कोंडीत वाढ झाली आहे. रात्री हा कंटेनर पुलाखाली अडकला आहे, अद्याप हटवण्यात आला नसल्याने कोंडीत वाढ झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* रायगडही जलमय

रायगड जिल्ह्यात बुधवारी संध्‍याकाळपासून मुसळधार कोसळत असलेल्‍या पावसामुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाडच्‍या सुकट गल्‍ली, भोईघाट परीसरात अडीच ते तीन फूटांपर्यंत पाणी आहे. तर बाजारपेठेत दोनफुटांपेक्षा अधिक पाणी आहे. दस्‍तुरीनाका , क्रास्‍तीस्‍तंभ परीसरदेखील जलममय झाला आहे. शहराजवळून वाहणारया सावित्री आणि काळ या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.

* कोकण, कोल्हापूर नंतर आता नागपुरात मुसळधार पाऊस

राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, जोरदार चालू असलेल्या पावसाने आता विदर्भाकडे कूच केलं आहे. गेल्या एका तासापासून नागपुरात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी खोल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पुढील 48 तासात नागपूर जिल्ह्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा नागपूर वेध शाळेने दिला आहे.

* चिपळूणला हेलिकॉप्टर सुविधा पोहोचविण्याचे तातडीने आदेश

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. संध्याकाळनंतर वाशिष्ठी नदीची पातळी वाढली त्यामुळे चिपळूण बाजारपेठेत शिरलं पाणी, वड नाका, टिळक वाचनालय या परिसरात रस्त्यावर पाणी पाहायला मिळाले आहे. घाटमाथ्यावर झालेला मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरलं आहे त्यामुळे रात्र चिपळूणकराना जागून काढावी लागली.

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने या ठिकाणी हेलिकॉप्टर सुविधा पोहोचविण्याचे तातडीने आदेश दिले आहेत. तसेच NDRF च्या दोन टीम रवाना झाल्या आहेत. कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी सुद्धा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. फूड पॅकेट्स व इतर वैद्यकीय सहकार्य उपलब्ध केले जात आहे. चिपळूण शहरात 5 हजार लोक अडकले आहेत. अनेक घरात पाणी शिरले आहे.

You Might Also Like

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मंत्रालयात अभिवादन

रेल्वे प्रकल्प मंजुरीबद्दल अशोक चव्हाणांचे पंतप्रधानांना आभार

महादेव मुंडे हत्या प्रकरण : 21 महिन्यांनंतरही आरोपी फरार

TAGGED: #Manytrains #canceled #dueto #torrential #rains #Mumbai, #मुंबई #झालेल्या #मुसळधार #पावसामुळे #अनेकरेल्वे #रद्द
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारतात लाँच होणार वन प्लस नॉर्ड टू OnePlus Nord 2
Next Article आत्महत्याग्रस्त स्वप्निल लोणकर कुटुंबियांचे कर्ज भाजपने फेडले

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?