Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठा आरक्षणावरुन संभाजीराजेंचा राज्यसरकारला गंभीर इशारा; उदयनराजेंनी फिरवली बैठकीकडे पाठ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मराठा आरक्षणावरुन संभाजीराजेंचा राज्यसरकारला गंभीर इशारा; उदयनराजेंनी फिरवली बैठकीकडे पाठ

Surajya Digital
Last updated: 2020/10/07 at 7:37 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आजच्या मराठा आरक्षण परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका मांडली. तसेच मराठा आरक्षणाच्याबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा गंभीर आरोप केला.

दरम्यान, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईतील माथाडी भवनात बुधवारी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित केली होती. मराठा आरक्षण परिषदेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे अठरापगड जातींचं होतं. मात्र आज त्यातून मराठा समाज बाहेर का फेकला गेलाय. बहुजनांसाठी शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते. मात्र आता मराठा समाज आरक्षणापासून वंचित का राहिलाय, असा सवाल करत संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान,  मी मराठा समाजाचा नेता नाही तर एक सेवक आहे’ अशी माझी प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे मी समाजाचा घटक म्हणून समाजाच्या सोबतच बसेन, अशी भूमिका घेऊन बैठकीत सहभागी झालो आहे, असे सांगत संभाजीराजे या बैठकीत सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला फसवलं आहे. या विषयाबाबत राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याही त्यांनी केलेल्या नाहीत. राज्य सरकारने सारथी संस्था बुडवली. अण्णासाहेब पाटील महामंडळाचा राज्य सरकारने खेळखंडोबा केला. सरकार मराठा समाजासोबत किती काळ खेळणार आहे. एमपीएससीमधून ४२७ विद्यार्थी पास झाले. त्यातील १२७ मराठा समाजातील आहेत. त्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

एमपीएससीची परीक्षा परीक्षा होऊ नयेत अशी मराठा समाजाची भावना आहे. मात्र तरीही सरकार परीक्षा देण्याची घाई का करत आहे, असा सवाल विचारत सरकारने ऐकले नाही तर मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद करेल. त्यामुळे राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घ्यावा. असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

* उदयनराजेंनी फिरवली बैठकीकडे पाठ

या बैठकीला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार संभाजी राजे छत्रपती हे दोघेही एकत्रित उपस्थित राहणार असल्याची माहिती होती; परंतु उदयनराजेंनी यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.महिनाभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेल्या एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण पसरलेले आहे.

You Might Also Like

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

TAGGED: #संभाजीराजे #उदयनराजे #बैठक #मराठाआरक्षण #राज्यसरकार #फसवले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वेळापूर गोळीबार प्रकरणातील आरोपीला पुण्यातून अटक; पोलिस कोठडीत रवानगी
Next Article शेतकरी सुखावला : राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये तुरीला 9,500 पर्यंतचा भाव

Latest News

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी
देश - विदेश June 25, 2025
केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत
महाराष्ट्र June 25, 2025
विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार
देश - विदेश June 25, 2025
अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक
देश - विदेश June 25, 2025
कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 25, 2025
आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
देश - विदेश June 25, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमधून 282 भारतीय मायदेशी परतले
देश - विदेश June 25, 2025
जम्मू-काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळला, दहशतवादी ठार
देश - विदेश June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?