Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमरावती : रामा इंडस्ट्रीजला भीषण आग; २५ बंबांनी विझविली आग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अमरावती : रामा इंडस्ट्रीजला भीषण आग; २५ बंबांनी विझविली आग

admin
Last updated: 2025/03/17 at 1:17 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 17 मार्च (हिं.स.)

एमआयडीसी येथील रामा इंडस्ट्रीजला अचानक आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करून पूर्ण इंडस्टीजमध्ये आग पसरली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आग विझविण्याकरिता अमरावतीसह एमआयडीसी, चांदूर रेल्वे आणि तिवसा येथील अग्निशमन बोलाविण्यात आल्या. आग विझविण्याकरिता एकूण २५ बंब लागले.

हनुमान अग्रवाल यांची एमआयडीसी येथे संजय ऑईल मील आणि रामा इंडस्ट्रीज नावाने कंपनी आहे. कंपनीमध्ये ढेप, सरकी, ऑईल आणि मोठ्या प्रमाणात बारदाना आहे. रविवारी संध्याकाळी कंपनी बंद असताना अचानक रामा इंडस्ट्रीजमधून धूर निघताना दिसताच कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, आगीचा लोंढा बाहेर आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तत्काळ मालकासह अग्निशमन विभागाला माहिती दिली. परंतु इंडस्ट्रीजमध्ये बारदाना, ढेप, सरकी आणि ऑईल असल्यामुळे आग क्षणातच चारही बाजूने पसरली. अग्निशमनच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या मात्र आगीने तोपर्यत रौद्ररूप धारण केले होते.

आग आजुबाजुच्या कंपनीपर्यंत पोहचू नये त्यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांनी चारही बाजूने पाण्याचा मारा केला. परंतु आग आटोक्यात येत नव्हती. एका पाठोपाट २० पाण्याचे बंब घटनास्थळी पोहचले तरीसुध्दा आग पसरत होती. हे पाहताच अग्निशमन विभागाने एमआयडीसी, चांदुर रेल्वे आणि तिवसा येथील बंब बोलाविले. चारही बाजूने सतत पाण्याचा मारा असल्यामुळे आग आटोक्यात आली. परंतु आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केकेआर संघात स्टार बॉलर उमरान मलिकच्या जागी खेळणार चेतन सकारिया
Next Article ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामविस्ताराचा निर्णय तातडीने घ्यावा – राजेश क्षीरसागर

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?