Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘रिपाइं’ ऐक्यासाठी मायावतींनी नेतृत्व करावे – रामदास आठवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

‘रिपाइं’ ऐक्यासाठी मायावतींनी नेतृत्व करावे – रामदास आठवले

admin
Last updated: 2025/08/05 at 5:40 PM
admin
Share
1 Min Read
SHARE
मुंबई, ५ ऑगस्ट – देशातील रिपब्लिकन पक्षाच्या गटांमध्ये ऐक्य साधण्यासाठी आणि दलितांची एकजूट घडवून आणण्यासाठी बहुजन समाज पक्षाच्या (बसप) अध्यक्षा व माजी मुख्यमंत्री मायावती यांनी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे नेतृत्व करावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले यांनी सांगितले की, मायावतींच्या बसप पक्षाची स्थिती सध्या कमकुवत असून, केवळ एक आमदार व एक खासदार शिल्लक राहिला आहे. दुसरीकडे, ‘रिपाइं-ए’ गट हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा खरा राजकीय पक्ष आहे. मायावती यांचा पूर्वीचा करिष्मा आता उरलेला नाही, पण तरीही त्यांच्याकडे अनुभव आणि क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन ‘रिपाइं’ गटांमध्ये एकात्मता निर्माण करावी, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

राज्यात ‘रिपाइं’चे अनेक गट कार्यरत आहेत, आणि त्यामध्ये आठवले यांचा ‘रिपाइं-ए’ हा प्रमुख गट मानला जातो. सध्या आठवले हे राज्यसभेचे सदस्य आहेत आणि भाजपच्या महायुतीत सामील असल्याचा त्यांचा दावा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्या गटाला एकच जागा दिली होती, ती देखील भाजपच्या चिन्हावर लढवण्याच्या अटीसह होती. सध्या त्यांच्या गटाचा राज्यात कोणताही आमदार किंवा खासदार नाही.

अशा स्थितीत, त्यांनी उत्तर प्रदेशातील चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावतींना ‘रिपाइं’च्या ऐक्यासाठी नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन करून चर्चेचा नवा अध्याय सुरू केला आहे.

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई पालिका निवडणुकीत रिपाइंला २५ जागा मिळाव्यात – रामदास आठवले
Next Article गडकरींच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न; महिला पोलिसाचा विनयभंग

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?