Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मेळघाटातील ५० खेडी पावसामुळे वेढली; दळणवळण ठप्प
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

मेळघाटातील ५० खेडी पावसामुळे वेढली; दळणवळण ठप्प

admin
Last updated: 2025/08/19 at 5:55 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 19 ऑगस्ट – मेळघाटातील सततधार पावसामुळे पंचतरीतांसह उपनद्यांना पूर आला असून ५० हून अधिक खेडी अडचणीत सापडली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याने धारणी व चिखलदरा तालुक्यांतील घनदाट अरण्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांपुढे उपासमारीचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नदीकाठच्या व ओहळलगतच्या वस्त्यांमध्ये पूरस्थिती गंभीर बनली असून महसूल प्रशासनाकडून एलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सूर्यपुत्री तापी नदीसह सीपना, गडगा, खंडु, खापरा आणि डोलार या नद्यांना प्रचंड पूर आला आहे. राजादेही, डवाल, कुकरी, मेलडोह, कावरा, टिंगच्या आणि चमारकुंडी यांसारख्या उपनद्यांचे पाणी मिळाल्याने नद्यांचा प्रवाह आणखी वाढला आहे.

चिखलदऱ्यात डोंगर पठारावरील आदिवासी वस्त्यांवर नैसर्गिक संकट ओढवले असून ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे वाहतूक साधने ठप्प झाली असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित झाला आहे. धारणी तालुक्यातील राणीगाव, बैरागड, खोपमार, रंगबेली, चौराकुंड, झिलांपाटी, कबडाझरी तसेच चिखलदऱ्यातील भुत्रुम, रुहीपठार, भाडूम या गावांवर दळणवळणाचे संकट ओढवले आहे.

परतवाडा आगारातून सुटणाऱ्या एसटी बससेवा पावसामुळे तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण जनतेचा प्रवास आणि आपत्कालीन संपर्क पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा दिला आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढील ४८ तास निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले असून प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You Might Also Like

हल्ल्यानंतर मी काही वेळ धक्क्यात होते, मात्र आता मी बरी – मुख्यमंत्री रेखा गुप्ता

राजभवन येथे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींना अभिवादन

भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानच्या अत्याचारांचा केला पर्दाफाश

उत्तर नायजेरियातील मशिदीत गोळीबार; २७ ठार

एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये शिकवले जाणार ‘ऑपरेशन सिंदूर’

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रामदास आठवले यांना लंडनमध्ये ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्काराने गौरव
Next Article अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

Latest News

हल्ल्यानंतर मी काही वेळ धक्क्यात होते, मात्र आता मी बरी – मुख्यमंत्री रेखा गुप्ता
देश - विदेश August 20, 2025
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र August 20, 2025
सी. पी. राधाकृष्णन यांना महाराष्ट्रातील विरोधी पक्षानेही मतदान करावे – रामदास आठवले
Top News राजकारण August 20, 2025
बीडमध्ये सरकारी वकिलाची कोर्टात गळफास घेऊन आत्महत्या
महाराष्ट्र August 20, 2025
बांगलादेशकडून आयातबंदी उठवल्यानंतर कांद्याच्या दरात अल्प वाढ
महाराष्ट्र August 20, 2025
राजभवन येथे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींना अभिवादन
देश - विदेश August 20, 2025
नांदेड आपत्तीग्रस्तांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांचा मदत धनादेश
महाराष्ट्र August 20, 2025
नुकसानग्रस्तांना शासनाची सर्वतोपरी मदत – मंत्री गिरीश महाजन
महाराष्ट्र August 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?