Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वाचाळवीर आमदार मिटकरींवर तत्काळ गुन्हा दाखल करा; समस्त ब्राह्मण समाजाची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

वाचाळवीर आमदार मिटकरींवर तत्काळ गुन्हा दाखल करा; समस्त ब्राह्मण समाजाची मागणी

Surajya Digital
Last updated: 2022/04/22 at 2:49 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : सांगली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात समस्त पुरोहित वर्गाबद्दल चुकीचे विधान करत त्यांची बदनामी केल्याबद्दल आमदार अमोल मिटकरी यांच्यावर तात्काळ गुन्हा दखल करावा, अशी मागणी सोलापुरातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली.

मारुती स्तोत्रचे म्हणून रामरक्षा स्तोत्र म्हणून दाखवत सगळ्याची फसवणूक केली तसेच कन्यादानच्या विधीची चेष्टा करत समस्त पुरोहित वर्गाला लज्जा वाटेल, असे विधान करत मेटकरी यांनी समाजाची बदनामी केली. यामुळे सोलापुरातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने जयंत फडके गुरुजी व ब्राह्मण समाजाचे नेते प्रा. काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेउन गुन्हा दाखल करण्या विषयी निवेदन दिले. जर गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कुलकर्णी यांनी यावेळेस दिला.

File an immediate case against the talkative MLA Mitkari; Demand of the entire Brahmin community

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

यावेळी वेद प्रतिष्ठानने पुढाकार घेत गुन्हा दाखल करण्याविषयी आग्रही भूमिका घेतली. यावेळी प्रसाद देशमुख , वैभव कामतकर , अनिरुध्द जोशी , राजाभाऊ कुलकर्णी , रंगनाथ उपाध्ये , हनुमंत हुंडेकरी , किरण उपाध्ये , आनंद हुंडेकरे , दिपक कुलकर्णी , किरण कुलकर्णी , हर्षल जोशी , राजु निंबर्गी , उमेश काशीकर , पंकज कुलकर्णी, अभिजीत तेरकर , आनंद तेरकर, प्रसाद पैठणकर, संपदा जोशी, प्रल्हाद देशमुख , सुमीत कुलकर्णी, बजरंग कुलकर्णी , विक्रम डोनसळे , राहुल उपाध्ये , सचिन वेणेगुरकर , निशिकांत खेडकर यांच्यासह वेद प्रतिष्ठान , ब्रम्हगर्जना प्रतिष्ठान , ब्राह्मण महासंघ , अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

□ अमोल मिटकरी काय म्हणाले….

सांगलीतल्या सभेत बोलताना अमोल मिटकरींनी एक किस्सा सांगितला होता. “एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान सुरु होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार?”, असं मिटकरी म्हणाले होते.

 

दरम्यान, या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.

● अमोल मिटकरींची भूमिका

काल गुरुवारी (ता. 21) पुण्यात तर ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यासर्व प्रकारानंतर अमोल मिटकरी यांनी यासर्व प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही समाजाबद्दल अपशब्द वापरले नाहीत, असं म्हणत अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि जी लोक आज मला माफी मागा असं म्हणत आहेत, त्यांना माझा विनम्रतेने आवाहन आहे. राजमाता जिजाऊंच्या बाबतीत राजा शिवछत्रपती कादंबरीमध्ये ज्या बदनाम्या झाल्या आणि त्यांचं परत पुरस्कार करणारे वातावरण अगदी काही महाराष्ट्राच्या वातावरणात सुरू आहे. त्या पुरंदरे यांनी लिहिलेल्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या अपमानकारक मजकुराची माफी मागावी.”, असं मिटकरी म्हणाले.

तसेच पुढे बोलताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्यव्य केलं, त्यांनी तर त्याची माफी मागितली नाही, असं म्हणाले. तसेच, मी कुणाच्या जातीविरुद्ध धर्माविरुद्ध बोललो नाही, भाजप प्रणित संघटनांनी यामध्ये फक्त राजकारण चालविलं आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीकाही केली.

 

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #File #immediate #case #talkative #MLA #Mitkari #Demand #entire #Brahmin #community, #वाचाळवीर #आमदार #मिटकरी #तत्काळ #गुन्हा #दाखल #ब्राह्मण #समाज #मागणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपुरात शेतकऱ्यांकडून वसूल केलेली रक्कम वायरमनने केली हडप
Next Article मोहोळ : बस आणि जीपचा भीषण अपघात, दोन ठार

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?