Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोठा निर्णय : मोदी सरकारचा शिक्षकांना दिलास; टीईटीची कटकट झाली कमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

मोठा निर्णय : मोदी सरकारचा शिक्षकांना दिलास; टीईटीची कटकट झाली कमी

Surajya Digital
Last updated: 2020/10/21 at 4:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी बीएड, डीएड केले जाते. पण, गरजु किंवा हुशार उमेदवार वशिलेबाजीमुळे मागे राहतो आणि तिसराच व्यक्ती शिक्षक बनून जातो. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी ही पद्धत थांबविण्यासाठी शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) घेण्याचा निर्णय घेतला होता. पण शिक्षक झालेल्यांसाठी ही परिक्षा सक्तीची तसेच नव्या उमेदवारांसाठी अडचणीची ठरू लागली होती. केंद्र सरकारने आता यावर मोठा दिलासा दिला आहे.

शिक्षकाची नोकरी लागलेल्यांसाठी सुरुवातीच्या काळात टीईटी परिक्षा देणे बंधनकारक केले होते. तसेच टीईटी परिक्षा दरवर्षी घेतली जात होती. एकदा ही परिक्षा पास झाला की सात वर्षे हे उत्तीर्ण सर्टिफिकिट लागू राहत होते. पण आता याबाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. टीईटी परिक्षा एकदा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उमेदवाराला आयुष्यात पुन्हा कधीही टीईटी परिक्षा द्यावी लागणार नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

वशिलेबाजीने अनेक राज्यांमध्ये नोकरी लागल्यामुळे शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. बऱ्याच शिक्षकांना साधे पाढे येत नसल्याचे सरकारी पाहणीत आढळून आले होते. तर अनेकांना इंग्रजी स्पेलिंग येत नसल्याचेही समोर आल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमालीची ढासळली होती. शिक्षक भरतीचे मोठमोठे घोटाळे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये उघड झाले आहेत.

प्रतिभावान उमेदवारांना टीईटीमुळे शिक्षकाची नोकरी मिळविणे सोपे झाले आहे. यात आता आणखी एक दिलासा मिळाला आहे. टीईटी परिक्षा आयुष्यभरासाठी केंद्र सरकारने मान्य केल्यामुळे सात वर्षे नोकरी न मिळाल्यास पुन्हा गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुन्हा परिक्षा देण्याची वेळ उमेदवारांवर येणार नाही.

नियमांमध्ये बदल नॅशनल काऊंसिल फॉर टिचर एज्युकेशन (एनसीटीई) द्वारे करण्यात आले आहेत. केंद्र सरकारसह राज्य सरकारांनाही हे नियम लागू होणार आहेत. एनसीटीई नियमांवरच दोन्ही सरकारांच्या परिक्षा या होतात. केंद्र सरकारसाठी सीबीएसई आणि राज्य स्वत:च परिक्षा आयोजित करतात. या नव्या निर्णयाचा फायदा महिलांना होणार आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #मोठानिर्णय #टीईटीपरीक्षा #कटकट #कमी #शिक्षकांना #दिलासा #मोदीसरकार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नाथाभाऊ आमचे मित्र, पण आता जिथे गेलेत, तिथं सुखी राहावे : दानवे
Next Article खासदार सुनबाई भाजपमध्येच, मात्र कन्या रोहिणी खडसे बांधणार हातात ‘घड्याळ’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?