Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भिमानगरच्या अपघातात मोहोळच्या तरुणाचा मृत्यू, निघाला होता एअर फोर्सच्या परीक्षेला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

भिमानगरच्या अपघातात मोहोळच्या तरुणाचा मृत्यू, निघाला होता एअर फोर्सच्या परीक्षेला

Surajya Digital
Last updated: 2021/11/29 at 10:13 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मोहोळ  : भिमानगर येथील अपघातात मोहोळ येथील सोमनाथ लक्ष्मण माळी या तरुणाचा समावेश असून तो पुणे येथे एअर फोर्स चा लेखी परीक्षेसाठी निघाला होता, मात्र काळाने त्याच्यावर झडप घातली.  त्याचा दुर्देवी मृत्यू झाला त्याच्यावर मोहोळ येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या उजनी धरणासमोर भीषण अपघातात ट्रक, टँकरची समोरासमोर धडक होऊन ५ जण ठार आणि ६ जण जखमी झाले. ट्रकचालक शिवाजी नामदेव पवार व टँकरचालक संजय शंकर कवडे (रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यासह मालमोटारीतून प्रवास करणाऱ्या व्यंकट दंडघुले (रा. सालेगाव, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) आणि अन्य दोघे अनोळखी प्रवासी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर दत्ता अशोक घंटे (वय २४, रा. सालेगाव, ता. लोहारा), व्यकूसिंह रतनसिंह राजपूत (वय ६६, रा. केसरजवळगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), गौरी दत्ता राजपूत (वय ३३, रा. पुणे), तिची मुले धीरज (वय १२) व मीनल (वय ४) आणि सुलोचना गोटूसिंह राजपूत (रा. पुणे) हे सहाजण जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ येथील माळी गल्लीत राहणाऱ्या सोमनाथ लक्ष्मण माळी हा २५ वर्षीय युवक गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस भरती तसेच एअर फोर्स भरतीसाठी सातत्याने प्रयत्न करत होता. आईचे सात वर्षांपूर्वी छत्र हरपले तरीही वडिलांनी हमाली करत त्याला प्रोत्साहन दिले. त्यानेही जिद्दीने पोलीस भरती च्या परीक्षेची तयारी केली होती.

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या कालावधीमध्ये परीक्षा झाल्या नाहीत, मात्र त्याने खचून न जाता दुकानामध्ये काम करत स्वतः पैसे जमवले. व त्यातूनच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेतला. त्यामाध्यमातून तो तयारी करत होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान दि. २८ नोव्हेंबर रोजी पुणे येथे एअरफोर्सचा लेखी परीक्षेचा पेपर सकाळी आठ वाजता असल्यामुळे त्याने दि.२७ रोजी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान मोहोळ शहरातून पुण्याकडे निघाला होता. मात्र एसटीचा संप असल्याने त्याने मोहोळकडून पुण्याकडे निघालेल्या ट्रक क्रमांक एम एच २५ यु ४०४५ या तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून पुण्याकडे जाण्याऱ्या ट्रकमधून पुण्याकडे निघाला होता.

त्यांच्यासोबत इतर आठ ते दहा प्रवासी होते. दरम्यान साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सदरचा ट्रक हा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भिमानगर (ता. माढा) गावच्या हद्दीतील एका ढाब्यासमोर आला असता पुण्याकडून सोलापूरकडे निघालेल्या मळी वाहतुकीच्या टँकर क्रमांक एम एच २५  सी.पी. ४०२० ची समोरासमोर जोराची धडक झाली.

हा अपघात एवढा भयानक होता की, या अपघातात पाच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले. या मृतांमध्ये मोहोळ येथील सोमनाथ माळी याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. तर शरीरापासून मुंडके वेगळे झाल्यामुळे पहाटेपर्यंत पोलीस व सामाजिक कार्यकर्ते त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते.

अखेर त्याच्या खिशातील मोबाईल च्या अखेरच्या कॉल वरून त्याच्या मोहोळ येथील मित्राला संपर्क करून ओळख पटवून नातेवाईकांना संपर्क करण्यात आला. त्यानंतर त्याचे नातेवाईक टेंभुर्णी येथे गेले व प्रेत ताब्यात घेऊन दि. २८ रोजी दुपारी मोहोळ येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत सोमनाथ त्याच्या पश्चात वडील, एक भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #Mohol #youth #dies #Bhimanagar #accident #airforce, #भिमानगर #अपघातात #मोहोळ #तरुण #मृत्यू #एअरफोर्स #परीक्षेला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताला विजयासाठी 9 विकेट्सची गरज, कोण जिंकणार? भारत की न्यूझीलंड
Next Article कर्नाटकातील अपघातात सोलापूरच्या माजी सरपंचासह चार ठार, घातपाताचा संशय

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?