Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतात मोती पिकविण्यासाठी सोने-चांदी गहाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शेतात मोती पिकविण्यासाठी सोने-चांदी गहाण

admin
Last updated: 2025/06/14 at 3:27 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 14 जून (हिं.स.) जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग वाढली आहे. बी-बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. काही बँका नियमित कर्ज उचलून परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज देतात. बऱ्याच वेळा कर्ज वेळेवर मिळत नाही. थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना तर बँका दारातही उभे करीत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी जवळची सोने-चांदी गहाण ठेवून वेळप्रसंगी विकून शेती करावी लागत आहे.

अमरावती जिल्ह्यात पाच वर्षापासून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि शेतमालाला भाव नसल्यामुळे बऱ्याच वेळा तर शेतीत लावलेला पैसाही निघत नाही. शासनाने जाहीर केलेला हभीभावही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. यातूनच आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेताना शेतकरी दिसून येतो. एकीकडे बी-बियाणे, खत व मजुरीचे दर दरवर्षी वाढत आहेत. यंदा बियाण्यांचे दर १०० ते २०० रुपयांनी वाढले आहे तर खताच्या दरात ५० ते ३०० रुपयांची वाढ झालेली आहे. या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ओढावले आहे.

थकीत शेतकऱ्यास बँक पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होते. विविध कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामुळे थकीत कर्जदारांना अडचणी येतात. सोने-चांदी गहाण ठेवण्यासाठी अनेकदा सराफांकडे शेतकरी धाव घेतात.

(सराफा व्यावसायिक)

निवडणुकांत शेतकऱ्यांच्या नावाने मत मागितले जाते. परंतु, निवडणुकांत जिंकताच धनदांडग्यांचे कर्ज माफ केले जाते. गरीब शेतकऱ्यांचे कर्ज थकीत राहते. त्यामुळे कर्जबाजार अवस्थेत शेतकऱ्यांना जीवन जगावे लागते. शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी नसल्याची भावना शेतकऱ्यांत आहे. थकीत शेतकऱ्यांना कर्ज देण्याची व्यवस्था शासनाने करावी.

प्रदिप बंड शेतकरी, जसपूर

गत पाच वर्षांपासून शेतमालाला खुल्या बाजारात हमीभाव मिळत नाही. दिवाळीत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. अनेकदा खर्चही शेतीतून निघत नाही. परंतु, वडिलोपार्जित शेती म्हणून सोने गहाण ठेवण्याची वेळ येते.

मंगेश देशमुख शेतकरी (वणी बेलखेड)

मोडीचा भाव काय ?

शुद्ध सोन्याला (मोड काढून) ८० टक्क्यांपर्यंत रक्कम दिली जाते. गहाण ठेवलेल्या वस्तूवर ६० ते ७० टक्के इतकी रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाते. थकीत शेतकरी वस्तू गहाण ठेवूनच आपली अडचण भागवितात.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी
Next Article अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?