Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताचा मुंबई कसोटीत शानदार विजय; न्यूझीलंडच्या एजाज पटेलने इतिहास रचला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

भारताचा मुंबई कसोटीत शानदार विजय; न्यूझीलंडच्या एजाज पटेलने इतिहास रचला

Surajya Digital
Last updated: 2021/12/06 at 12:35 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : भारताने न्यूझीलंडविरुद्धची मुंबई कसोटी जिंकली आहे. भारताने या सामन्यात 372 धावांनी विजय मिळवला. सोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका भारताने 1-0 अशा फरकाने जिंकली. मुंबई कसोटीत 540 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव 167 धावांवर आटोपला. तर पहिल्या डावात न्यूझीलंडने 67 धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या. तसेच दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित केला.

मुंबईतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव करत दोन सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली. 540 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात 167 धावांत आटोपला.

टीम इंडियानं या 5 विकेट्स फक्त 45 मिनिटांमध्ये मिळवत न्यूझीलंडचा 372 रनने मोठा पराभव केला. टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी 540 रनचे आव्हान दिले होते. ते आव्हान न्यूझीलंडला पेलवले नाही. त्यांची संपूर्ण टीम 167 रनवर ऑल आऊट झाली.

टीम इंडियात 4 वर्षांनी परतलेला मुंबई इंडियन्सचा स्पिनर जयंत यादव चौथ्या दिवसाचा हिरो ठरला. त्यानं झटपट विकेट्स घेत भारतीय टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयाबरोबरच टीम इंडियाने ही टेस्ट सीरिज 1-0 ने जिंकली आहे. टीम इंडियाकडून दुसऱ्या इनिंगमध्ये आर. अश्विन आणि जयंत यादवने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. जयंत यादवने सोमवारी सकाळी झटपट 3 विकेट्स घेत न्यूझीलंडचा पराभव जवळ आणला.

https://twitter.com/BCCI/status/1467731958264258561?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1467731958264258561%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

 

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

न्यूझीलंडच्या एजाज पटेलनं या टेस्टमधील एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. पण या कामगिरीनंतरही न्यूझीलंडची नामुश्की त्याला टाळता आली नाही. एजाजने पहिल्या इनिंगमध्ये 10 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट्स घेतल्या.

मुंबई टेस्टमध्ये विक्रमी 14 विकेट्स घेणाऱ्या एजाजला न्यूझीलंडच्या अन्य खेळाडूंनी साथ दिली नाही. खराब अंपायरिंगवर विराट कोहली संतापला, भर मैदानात म्हणाला… टीम इंडियाच्या 325 रनला उत्तर देताना न्यूझीलंडची पहिली इनिंग फक्त 62 रनवर ऑल आऊट झाली. कोणत्याही टीमचा टेस्ट क्रिकेटमधील हा सर्वात कमी स्कोअर आहे. टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 7 आऊट 276 रनवर इनिंग घोषित केली. त्यानंतर भारतीय स्पिनर्सनी न्यूझीलंडला स्थिराऊ दिले नाही. पहिल्या इनिंगमध्ये 150 आणि दुसऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये 62 रन काढणाऱ्या मयंक अग्रवालनं देखील टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले.

मुंबई कसोटीतील विजयासह टीम इंडिया कसोटी क्रिकेटमधील नंबर वन संघ बनला आहे. त्यांनी न्यूझीलंडकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले. किवी संघाने जून 2021 मध्ये भारताकडून हा दर्जा हिरावून घेतला होता आणि त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून आपले स्थान पक्के केले होते. पण आता टीम इंडियाने वळण घेतले आहे. आयसीसीकडून याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. आयसीसी दर बुधवारी आपली क्रमवारी अपडेट करते. त्यानंतरच क्रमवारीतील बदल दिसून येतो. भारताने कानपूर कसोटी जिंकली असती, तरी त्यांनी पहिला क्रमांक पटकावला असता.

* 14 विकेट्स ! एजाज पटेलने इतिहास रचला

मुंबई कसोटीत भारताच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने 10 विकेट्स घेतल्या. तसेच दुसऱ्या डावात एजाजने भारताचे 4 फलंदाज बाद केले. 225 धावा देऊन एकूण 14 विकेट्स घेणारा एजाज टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात भारताविरोधात एका टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी 41 वर्षांआधी इंग्लंडच्या इयॉन बॉथमने भारताविरोधात एकूण 13 विकेट्स घेतल्या होत्या.

You Might Also Like

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा विक्रमी १५० वा वनडे सामना

TAGGED: #India's #stunning #victory #Mumbai #Test #EjazPatel #NewZealand #history, #भारत #मुंबई #कसोटी #शानदार #विजय #न्यूझीलंड #एजाजपटेल #इतिहास #रचला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नगरसेवक नागेश दुधाळ यांच्या गोळीबाराबाबत साशंकता
Next Article बार्शी वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?