Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ही काही राष्ट्रीय बातमी नाही; आरोग्यमंत्र्यांचे धक्कादायक वक्तव्य
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

ही काही राष्ट्रीय बातमी नाही; आरोग्यमंत्र्यांचे धक्कादायक वक्तव्य

Surajya Digital
Last updated: 2021/04/23 at 9:37 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : विरारच्या रुग्णालयातील आगीत १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. ही घटना राष्ट्रीय बातमी नसल्याचे टोपे म्हणाले. दरम्यान, लोकांच्या मृत्यूला आरोग्यमंत्री फक्त बातमीच्या माध्यमातून पाहतात, यापेक्षा शरमेची बाब नाही. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केली.

राज्य सरकार आता तरी जागे व्हा!!#surajyadigital #virar #Pravindarekar #bjp #भाजप #fire
नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाचं विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपणे CMOMaharashtra 'जबाबदार' आहेhttps://t.co/M2xEpiwwSJ

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या रुग्णालयातील एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नाशिक ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेला अवघे २ दिवस झालेले असताना विरारमध्ये घडलेली ही घटना म्हणजे राज्याला मोठा धक्का आहे.

विरारमधील रूग्णालयाला आग; मृतांचा आकडा 13 वर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता https://t.co/zYuCLhYDnb

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021

मात्र, दुसरीकडे या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या एका विधानामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंतप्रधानांशी याबाबत चर्चा झाली का ? असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता राजेश टोपे म्हणाले की, ‘चर्चा झाली पण ही नॅशनल न्यूज नाही.’

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राजेश टोपेंना त्यानंतर पत्रकाराने विचारले कि ‘१३ जणांचा मृत्यू झाला ही नॅशनल न्यूज नाही का?’ या प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले कि, ‘अरे बाबा, राज्य सरकारच्या अंतर्गत आम्ही पूर्ण मदत करणार आहोत. यामध्ये महापालिकेकडून 5 लाखांची, राज्य सरकारकडून ५ लाखांची अशी १० लाखांची मदत देणार आहोत.

महाराष्ट्रात प्रवासासाठी लागणार ई-पास, वाचा सविस्तर बातमी https://t.co/LwenMMgTNj

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021

नाशिकमधील घटनेप्रमाणेच इथेही मदत दिली जाईल. कोणत्याही इमारतीचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आणि इलेक्ट्रीकल ऑडिट करणं आवश्यक असतं. हे नियम न पाळणाऱ्या आणि त्यासंदर्भात दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाणार आहे. १० दिवसांत यासंदर्भात अहवाल सादर केला जाईल. घडलेली घटना दुर्देवी आहे’ असं म्हटलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी.

महाराष्ट्रात कोविड मृत्यूचे तांडव सुरू आहे

विरार कोविड हॉस्पिटलमधे 13 मृत्यू. कधी ऑक्सिजन तर कधी आग. ठाकरे सरकारनी कोविड रुग्णां साठी भारत सरकार आणि सैन्याची मदत घ्यावी

तज्ञांद्वारे कोवीड केंद्रांचे ऑक्सिजन आणि आग सुरक्षेचे ऑडिट करावे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मुक्त करावे pic.twitter.com/C9ZoWanUqJ

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 23, 2021

महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे’ अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

अवकाळीचं संकट ! 'तो' मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुन्हा येणार #surajyadigital #rain #पाऊस #अवकाळी #संकट #crisis pic.twitter.com/9HakXeCCro

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

TAGGED: #National #News #RajeshTope #HealthMinister #shocking #Statement, #राष्ट्रीय #बातमीनाही #राजेशटोपे #आरोग्यमंत्री #धक्कादायक #वक्तव्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आता हवाई दलाची मदत; ऑक्सिजन कंटेनर ‘एअरलिफ्ट’
Next Article खुशखबर ! भारतात कोरोनावरील औषधाला मान्यता

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?