Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शाश्वत कृषी विकासासाठी नैसर्गिक शेती गरजेची – चंद्रकांत पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

शाश्वत कृषी विकासासाठी नैसर्गिक शेती गरजेची – चंद्रकांत पाटील

admin
Last updated: 2025/07/05 at 4:25 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 5 जुलै (हिं.स.) देशाच्या आर्थिक विकासात शेतीचा सर्वाधिक वाटा आहे. मात्र अलिकडच्या काळात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचा कस कमी होत आहे.तो वाढविण्यासाठी शास्त्रशुद्ध नैसर्गिक शेतीची गरज आहे, असे मत देशाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात ‘शाश्वत कृषी संजीवनी’ या अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

सर अल्बर्ट हॉवर्ड यांनी १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘अॅन अॅग्रिकल्चरल टेस्टामेंट’ इंग्रजी पुस्तकाचे प्रा. अनिल व्यास यांनी अनुवाद केला आहे. डॉ. शिरनामे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शरद गडाख, खासदार मेधा कुलकर्णी, आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मदनगोपाल वार्ष्णेय, भारतीय किसान संघाच्या प्रांत उपाध्यक्षा स्नेहलता सावंत, सेवावर्धिनीचे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन, प्रकाशक रविंद्र घाटपांडे उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “शेतीच्या उत्पन्नवाढीसाठी सरकार प्रयत्न करत असून, सेंद्रीय शेती, माती परिक्षण आणि बियाणांच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. या पुस्तकाचा विद्यार्थी आणि संशोधकांना कृषी संशोधनात नक्कीच फायदा होईल.”

देशाच्या प्रगतीत कृषी क्षेत्राचा सर्वाधिक वाटा असल्याचे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या,”रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या वापरातून शेतीचे अपरिमित नुकसान होत आहे. त्यामुळे आपल्याला जैविक शेतीकडे वळायला हवे. आधुनिकतेबरोबरच शाश्वत पारंपारिक शास्त्राचाही वापर व्हायला हवा.”

कृषी उत्पादनांच्या वाढीसाठी भूमी सुपोषण होणे गरजेचे असल्याचे सांगत प्रा. वार्ष्णेय म्हणाले, “भारतीय शेतीचा २५ वर्षे अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या सर अल्बर्ट हार्वर्ड यांनी १०० वर्षांपूर्वी हे पुस्तक लिहिले. त्यांनी नैसर्गिक शेतीचा आणि एकात्म कृषी संशोधनाचा केवळ पुरस्कार केला नाही तर इंदोरच्या होळकारांनी दिलेल्या ७५ एकर जमिनीवर कृषी संशोधन केंद्रही स्थापन केले.”

You Might Also Like

लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना

देशभरात मान्सूनचा जोर; मप्र-राजस्थानात पूरस्थिती, वीज कोसळून, बुडून पाच जणांचा मृत्यू

राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून उज्ज्वल निकमांसह चौघे राज्यसभेवर

दिग्गज दाक्षिणात्य अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन

भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ३-२ ने जिंकली

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठीविरोधी वक्तव्याचा परिणाम; मनसेचा हल्ला, सुशील केडिया यांची माफी
Next Article ‘जय गुजरात’ म्हणणाऱ्या महायुतीने राज्याची माफी मागावी – डॉ.हुलगेश चलवादी

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?