Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोबाईल ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी; 30 दिवसांचा असेल मोबाईल रिचार्ज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

मोबाईल ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी; 30 दिवसांचा असेल मोबाईल रिचार्ज

Surajya Digital
Last updated: 2022/04/02 at 5:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश दिला आहे. कंपन्यांना कमीत-कमी एक रिचार्ज प्लॅन असा ठेवावा लागेल ज्याची व्हॅलिडिटी संपूर्ण महिना असेल. म्हणजे सध्याचे रिचार्ज प्लॅन हे 28 दिवस, 24 दिवस असे आहेत. ते 28 दिवस न ठेवता संपूर्ण 30 किंवा 31 दिवस ठेवावेत असे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी टेलिकॉम कंपन्यांना 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, काही कंपन्यांनी असा प्लॅन सुरू केलाय.

म्हणजेच आता सध्याचे रिचार्ज प्लॅन हे 28 दिवस, 24 दिवस असे आहेत. ते 28 दिवस न ठेवता संपूर्ण 30 किंवा 31 दिवस ठेवावेत असे आदेश देण्यात आले आहेत. टेलिकॉम कंपन्यांना यासाठी 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. TRAI ने टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom Companies) कमीत-कमी एक प्लॅन, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक स्पेशल रिचार्ज प्लॅन संपूर्ण महिन्याभराच्या वॅलिडिटीसह असावा.

जर 31 तारीख पुढील महिन्यात येत नसेल तर पुढील महिन्याची शेवटच्या तारीखेला रिचार्ज करावा लागेल. कंपन्यांना या बदलांसाठी 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून 1 जून 2022 पासून संपूर्ण एका महिन्याचा रिचार्ज प्लॅन आवश्यक असणार आहे. अनेक टेलिकॉम कंपन्या एका महिन्याच्या रिचार्जच्या नावाने केवळ 28 दिवस चालणारा रिचार्ज देतात. याबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत होत्या.

 

काही दिवसांपूर्वीच ट्रायच्या आदेशानंतर जिओने एक महिन्याची वैधता असलेला प्लॅन आणले केला होता. त्यानंतर आता Airtel ने देखील दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत.

Great news for mobile customers; Mobile recharge will be for 30 days

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

ज्यांची वैधता एक महिन्याची आहे. एका महिन्याच्या वैधतेसह एअरटेलच्या दोन्ही नवीन प्लॅनच्या किंमती अनुक्रमे 296 रुपये आणि 319 रुपये आहेत. यापैकी 296 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची असून 319 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता संपूर्ण महिन्यासाठी आहे म्हणजेच तुम्ही ज्या तारखेला रिचार्ज कराल, त्याच तारखेला पुढील महिन्यात रिचार्ज करावे लागणार आहे. स्वतः. काही महिन्यांपूर्वी ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना एका महिन्याच्या वैधतेसह नवीन प्लॅन जाहिर करण्याचे आदेश दिले होते.

एअरटेलने हे दोन्ही नवीन प्लॅन आपल्या वेबसाइटवर लिस्ट केले आहेत. 296 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 दिवसांची वैधता असेल. याशिवाय या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएससह 25GB डेटा मिळेल.

Jio ने नुकताच 259 रुपयांचा प्लॅन आणला. ज्यामध्ये एक पूर्ण महिन्याच्या वैधतेसह ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असेल. तुम्ही हा प्लॅन एकाच वेळी अनेक वेळा रिचार्ज करू शकता. प्रत्येक महिन्याची वैधता संपल्यानंतर, नवीन योजना आपोआप सक्रिय होईल. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसही मिळतील. या प्लॅनमध्येही इतर प्लॅनप्रमाणे जिओचे सर्व ॲप्स सबस्क्राइब केले जातील.

 

You Might Also Like

राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट

चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे

शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

TAGGED: #Great #news #mobile #customers #Mobile #recharge #30days, #मोबाईल #ग्राहक #आनंद #बातमी #मोबाईल #रिचार्ज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाषा भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
Next Article आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील प्रभाकर साईलचा घातपाताची शक्यता, चौकशीचे आदेश

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?