Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुसळधार पावसाने उत्तर भारतात पूरस्थिती गंभीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top Newsदेश - विदेश

मुसळधार पावसाने उत्तर भारतात पूरस्थिती गंभीर

admin
Last updated: 2025/09/08 at 4:34 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : उत्तर भारतातील मुसळधार पावसामुळे राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर असून २३ जिल्ह्यांतील सुमारे २ हजार गावे पुराच्या विळख्यात अडकली आहेत. ३ लाख ८४ हजार लोकसंख्या बाधित झाली असून आतापर्यंत १२ जिल्ह्यांमध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल १२ दिवसांनंतर आज राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत, मात्र पूरग्रस्त भागातील शैक्षणिक संस्था पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. भाक्रा नांगल आणि पोंग धरणातील पाण्याची पातळी काहीशी कमी झाल्याने दिलासा मिळाला असला तरी धोका अद्याप कायम आहे.

राजस्थानातील उदयपूर, सालुंबर, जालोर, डुंगरपूर, सिरोही, बारमेर, जैसलमेर आणि बालोत्रा या आठ जिल्ह्यांमध्ये नद्या-ओढे दुथडी भरून वाहत असल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. भिलवाडा येथे पावसाच्या पाण्यात एक कार वाहून गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याने झाडावर चढून जीव वाचवला.

हथिनी कुंड बॅरेजमधून पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुनेचे पाणी शहरात घुसले आहे. वृंदावनमधील राधा वल्लभ मंदिर परिसर जलमय झाला असून बांके बिहारी मंदिरापासून अवघ्या १०० मीटरवर पूराचे पाणी वाहत आहे. शहरातील अनेक भागांत तीन फूट पाणी साचले असून नागरिकांना पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे. राम घाट आणि श्याम घाट परिसरातील बाजारपेठाही पाण्याखाली गेली आहे.

हिमाचल प्रदेशातही परिस्थिती गंभीर असून दोन राष्ट्रीय महामार्गांसह ८२४ रस्ते अद्याप बंद आहेत. यापैकी अनेक रस्ते दहा दिवसांपासून ठप्प आहेत. राज्यात या हंगामात सरासरीपेक्षा तब्बल ४५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. १ जून ते ७ सप्टेंबरदरम्यान ६५२.१ मिमी सरासरी पावसाऐवजी यंदा ९४८.५ मिमी पाऊस पडला आहे. या अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात भूस्खलनाचे प्रमाण वाढले असून वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे.

सततच्या पावसामुळे आणि वाढत्या पुरामुळे उत्तर भारतातील लाखो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य सुरू असले तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

You Might Also Like

इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

ऍड. राकेश किशोर यांची तात्पुरती नोंदणी रद्द

पंजाबमध्ये बब्बर खालसा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अखेर ३३ तासांच्या प्रतीक्षेनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन
Next Article जीएसटीमुळे ३५० सीसीखालील बाइक्स होणार स्वस्त

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?