नवी दिल्ली, 30 जून (हिं.स.) :
प्रवाशांच्या
सोयीसाठी रेल्वे अनेक बदल करण्याची तयारी करत आहे. सर्वात मोठा बदल आरक्षण
प्रणालीत होणार आहे. तिकीट आरक्षण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर केली जाण्यावर
भर देण्यात येणार आहे. प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी कळेल की, त्यांचे
तिकीट कन्फर्म झाले आहे की, नाही. सध्या ट्रेन
सुटण्याच्या ४ तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जातो. ज्यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांची
गैरसोय होते.
शेवटच्या
क्षणापर्यंत तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.
रेल्वे मंत्री अश्विनी
वैष्णव यांनी अलीकडेच या सुधारणांचा आढावा घेतला आणि अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
तर दुसरीकडे तत्काळ तिकिटे बुक करण्याचे नियमही अधिक कडक केले जातील. रेल्वे
बोर्डाच्या प्रस्तावानुसार दुपारी २ वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांचे आरक्षण
चार्ट आदल्या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत तयार केले जातील. यामुळे प्रतीक्षा
यादीतील प्रवाशांना त्यांचं तिकीट कन्फर्म आहे की, नाही ते आधीच कळू शकेल. यामुळे
गरज पडल्यास प्रव प्रवाशांना पर्यायी प्रवास व्यवस्था करता येईल.
रेल्वेमंत्र्यांनी
या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, तिकीट बुकिंग व्यवस्था
पारदर्शक, सोपी
आणि प्रभावी असावी. प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून सर्व व्यवस्था अत्याधुनिक बनवल्या
गेल्या पाहिजेत. तिकीट बुकिंगपासून प्रवासापर्यंतचे प्रत्येक पाऊल तंत्रज्ञानावर
आधारित आणि प्रवाशांना अनुकूल असावे. नवीन आरक्षण व्यवस्था सुलभ करण्याचे काम
सेंटर फॉर इन्फॉर्मेशन सिस्टमला देण्यात आले आहे. ही नवी व्यवस्था सध्याच्या
क्षमतेपेक्षा सुमारे दहापट अधिक सक्षम असेल.