सोलापूर, 29 एप्रिल (हिं.स.)।
बाजार समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी आम्ही कोणाबरोबर युती केली नाही स्वबळावर लढलो आणि ३ जागा जिंकल्या. १४ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली तर एक काँग्रेसचा उमेदवार घेतला. आम्हाला अपेक्षा एवढ्या जागा मिळाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
सोसायटी मतदारसंघात आमची ताकद नव्हती. त्यामुळे तेथे निवडून येण्याचा प्रश्न नव्हता. तरीही येथे आमच्या उमेदवारांना चांगली मते पडली आहेत. यापुढेही प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी अभिनंदनही केले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलला तीन जागा जरी मिळाल्या असल्या तरी आम्ही समाधानी आहोत प्रस्थापितांन विरोधात जी लढाई आम्ही सुरू केली होती त्यास आम्हाला यश येत आहे.