नवी दिल्ली, 26 जून (हिं.स.)
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा दमदार
आवाज सर्वांना आवडतो. पण,गेल्या काही काळापासून जेव्हा जेव्हा आपण एखाद्याला फोन
करायचो तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या गंभीर आणि दमदार आवाजात एक सूचना ऐकू येत होती.
“सायबर फसवणुकीपासून सावध
रहा…”. आता हा आवाज तुम्हाला त्रास देणार नाही. कारण सरकारने ही जागरूकता
मोहीम थांबवली आहे.
कोविड
काळात सुरू झालेला हा ऑडिओ संदेश भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाचा एक उपक्रम होता. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजात नागरिकांना
कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका, त्यांचा ओटीपी शेअर करू नका आणि कोणत्याही
कॉलवर बँकिंग तपशील देऊ नका असे सांगण्यात आले होते. सरकारचे हे पाऊल देशातील
वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी होते जे अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेशी
जोडलेले होते.
या
संदेशाचा उद्देश लोकांना जागरूक करणे हा असला तरी, सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त
केली होती. विशेषतः जेव्हा हा संदेश आपत्कालीन कॉलच्या मध्यभागी येत असे, तेव्हा
लोक अस्वस्थ व्हायचे. अशा परिस्थितीत, स्वतः अमिताभ बच्चन यांनाही ट्रोलिंगचा सामना
करावा लागला.
—————