Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: निर्यात शुल्क हटविल्यानंतरही कांद्याच्या भावाची घसरण सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

निर्यात शुल्क हटविल्यानंतरही कांद्याच्या भावाची घसरण सुरू

admin
Last updated: 2025/04/13 at 6:12 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

लासलगाव, 13 एप्रिल (हिं.स.)

: केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क हटवल्यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. आशिया खंडातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. केंद्र सरकारने कांद्याला अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी केली आहे.

लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत आहे. केंद्र सरकारने निर्यातशुल्क शून्य करूनही कांद्याच्या दरातील घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा किमान उत्पादन खर्चदेखील कांदा विक्रीतून मिळत नाही. अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारने कांद्याला अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.

महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांतून बाजापेठांमध्ये नवीन उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. शनिवारी (दि. १२) लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये, जास्तीत जास्त १३०१ रुपये तर सरासरी ११२५ रुपये क्विंटल भाव मिळाला तर लाल कांद्याला कमीत कमी ३०० रुपये, जास्तीत जास्त ८८० रुपये तर सरासरी ७०० रुपये क्विंटल भाव मिळाला.

चौकट

कांद्याचा उत्पादन खर्च अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल आहे. उत्पादन खर्चापेक्षाही अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल दीड ते दोन हजार रुपयांचे नुकसान होत आहे. सरकारने कांदा निर्यातशुल्क हटवण्यासाठी तीन ते चार महिने उशीर केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

-सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताच्या प्रसिद्ध भालाफेकपटू डीपी मनूवर 4 वर्षांची बंदी
Next Article अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी नवीन नियम लागू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?