Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: निर्यात शुल्क हटविल्यानंतरही कांद्याच्या भावाची घसरण सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

निर्यात शुल्क हटविल्यानंतरही कांद्याच्या भावाची घसरण सुरू

admin
Last updated: 2025/04/13 at 6:12 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

लासलगाव, 13 एप्रिल (हिं.स.)

: केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क हटवल्यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. आशिया खंडातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. केंद्र सरकारने कांद्याला अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी केली आहे.

लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत आहे. केंद्र सरकारने निर्यातशुल्क शून्य करूनही कांद्याच्या दरातील घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा किमान उत्पादन खर्चदेखील कांदा विक्रीतून मिळत नाही. अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारने कांद्याला अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.

महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांतून बाजापेठांमध्ये नवीन उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. शनिवारी (दि. १२) लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये, जास्तीत जास्त १३०१ रुपये तर सरासरी ११२५ रुपये क्विंटल भाव मिळाला तर लाल कांद्याला कमीत कमी ३०० रुपये, जास्तीत जास्त ८८० रुपये तर सरासरी ७०० रुपये क्विंटल भाव मिळाला.

चौकट

कांद्याचा उत्पादन खर्च अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल आहे. उत्पादन खर्चापेक्षाही अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल दीड ते दोन हजार रुपयांचे नुकसान होत आहे. सरकारने कांदा निर्यातशुल्क हटवण्यासाठी तीन ते चार महिने उशीर केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

-सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव

You Might Also Like

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताच्या प्रसिद्ध भालाफेकपटू डीपी मनूवर 4 वर्षांची बंदी
Next Article अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी नवीन नियम लागू

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?