– भारतीय दूतावासाकडून इराणमधील संपर्क कक्षही बंद
नवी दिल्ली, 26 जून (हिं.स.)
पश्चिम
आशियातील भारतीय नागरिकांचा आणखी एक गट बुधवारी रात्री राजधानी दिल्लीत दाखल झाला.
इराणमधील अडकलेल्या २७२ भारतीय आणि तीन नेपाळी नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत
आणण्यात आले आहे.
ऑपरेशन
सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकूण ३,४२६ भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले आहे. इराण आणि इस्रायलमधील
वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन सिंधू सुरू केले होते.
दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर झाली असली तरी परिस्थिती अजूनही सामान्य झालेली
नाही.तणावग्रस्त इराणमधून परतलेल्यांनी भारत सरकारचे
विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले
आहेत.
इराणमधील
भारतीय दूतावासाने सांगितले की, दोन्ही देशांमधील युद्धबंदी लक्षात घेता भारतीय नागरिकांना भारतात
आणण्याची प्रक्रिया हळूहळू संपेल. दूतावासाने सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट केली
आहे. त्यांनी सांगितले की, स्थलांतरासाठी नवीन नावे नोंदणी करण्यासाठी जो संपर्क कक्ष उघडण्यात
आला होता तो आता बंद करण्यात आला आहे. दरम्यान,भारत सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून
आहे.