Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: organic farming चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी नमामी चंद्रभागाअंतर्गत नदीकाठी होणार सेंद्रीय शेतीचा जागर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

organic farming चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी नमामी चंद्रभागाअंतर्गत नदीकाठी होणार सेंद्रीय शेतीचा जागर

Surajya Digital
Last updated: 2022/05/12 at 4:24 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

□ चंद्रभागेचे प्रदुषण रोखण्यासाठी शासकीय योजनांचा कृतीसंगम -सिईओ दिलीप स्वामी

□ नमामी चंद्रभागा अंतर्गत नदीकाठी सेंद्रीय शेतीचा जागर ..!

सोलापूर – नमामी चंद्रभागा अंतर्गत भीमा नदीचे प्रदुषण रोखणे साठी नदीकाठच्या शेती सेंद्रिय करणेसाठी अभियान हाती घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. To prevent pollution of Chandrabhaga, there will be awareness of organic farming along the river under Namami Chandrabhaga

जिल्हा परिषदेत आज भीमा नदी काठच्या गावात प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजना बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. नवनाथ नरळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, तसेच कृषी विस्तार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नमामी चंद्रभागा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वोपतरीने प्रयत्न करणेत येत आहे. भीमा नदी काठच्या शेतीमध्ये होणारे रासायनिक खतांचा वापर कमी करून त्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पशुपालन करणारे शेतकरी यांचे असलेले पशुच्या मल- मुत्राचे व्यवस्थापन करणेसाठी गांडुळखत प्रकल्प, स्लरी, तसेच कचरा पासून कंपोस्ट खत तयार करणे, गोबर गॅस, गोबरधन बाबत जनजागृती करून नदीकाठच्या शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करणेत येणार आहे, असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

 

भीमा नदीकाठी असलेले शेतकरी भिमेच्या पाण्यात जनावरे धुतली जातात, यासाठी दुसरी उपाय योजना काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. नदीचे पात्राच्या बाजूने वृक्षारोपन करून जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी चर्चा करण्यात आली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

https://www.facebook.com/109399567404448/posts/539202401090827/

 

□ नदीकाठच्या गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन

 

भीमा नदी काठच्या गावात शेतकरी मेळावे घेऊन त्यांना शेतकरी यांना घनकचरा व्यवस्थापन व सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन करणेत येणार आहे. २० मे नंतर पंढरपूर व माळशिरस तालुक्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

 

□ नदीकाठच्या 131 ग्रामपंचायती मध्ये प्रबोधनाचा जागर

 

भीमा नदी काठावर माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माढा, करमाळा, व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, या ९ तालुक्यांतून भीमा नदी वाहते. सुरूवातीला पायलट म्हणून दहा गावात ही मोहिम हाती घेणेत येत आहे. पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील नमामी चंद्रभागा अंतर्गत निवडलेल्या ग्रामपंचायती मध्ये याची सुरूवात करणेत येणार आहे. शासनाचे विविध योजनांचा कृतीसंगम करून चंद्रभागा प्रदुषणा पासून वाचविणेसाठी अभियान हाती घेणेत येत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

 

□ सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आराखडेस सुरूवात – स्मिता पाटील

नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतीचा समावेश सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत १३१ ग्रामपंचायतीचा समावेश करणेत आला आहे. सध्या आराखडे बनविण्यास सुरूवात झाली आहे. गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन झाल्यास ब-याच प्रमाणात नदीचे प्रदुषण रोखण्यास मदत होणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/539235811087486/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #prevent #pollution #Chandrabhaga #awareness #organicfarming #river #Namami #Chandrabhaga #solapur, #चंद्रभागा #प्रदूषण #रोखणे #नमामी #चंद्रभागाअंतर्गत #नदीकाठी #सेंद्रीयशेती #जागर #सीईओ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article युपीतल्या यमुना एक्सप्रेस वेवर अपघात – पुण्याचे पाच जण ठार
Next Article भीषण कार अपघात, टेकवाणी व्यापारी कुटुंबातील चौघे जण ठार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?