Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या उस्मानाबादच्या शेतकऱ्याचा उपचारावेळी मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या उस्मानाबादच्या शेतकऱ्याचा उपचारावेळी मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/08/29 at 5:36 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना एका शेतकऱ्याने 23 ऑगस्ट रोजी स्वत: ला पेटून घेतले होते. यानंतर त्याला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतू उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. A farmer of Osmanabad who was set on fire in front of the ministry died during treatment

 

सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. गावाकडील जमीन हडपल्याच्या कारणावरुन त्यांने पेटून घेतले होते. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सुभाष भानुदास देशमुख या उस्मानाबादच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

 

सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. 23 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांनी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली.

 

या घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालय येथे उपचार सुरू होते. आज सोमवारी (29 ऑगस्ट ) उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी त्यांना 11:55 वा. मयत घोषित करण्यात आले.

पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करत विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये मोठी चकमक झाली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना थेट धारेवर धरलं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही या प्रकरणाची माहिती घेतली असून संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच त्याला सर्व मदत केली, जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

सुभाष देशमुख यांनी त्यांच्या गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी (ता.24 ) सकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन शेतकरी सुभाष देशमुख यांची भेट घेतली होती. त्यांच्या तब्येतीची चौकशी करत त्यांची अडचण जाणून घेतली.

 

दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतक-यांना उद्देशून भावनिक पत्र लिहले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिले असून, यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना शिवछत्रपतींची शपथ देत आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे. “महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे.

 

भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आलेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवत आहात.

म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं”, असे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी म्हटले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #farmer #Osmanabad #set #fire #front #ministry #died #treatment #Maharashtra, #मंत्रालय #पेटवून #उस्मानाबाद #शेतकरी #उपचार #मृत्यू #अजितपवार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिलीप मानेंच्या उपोषण आंदोलनाचा ‘धसका’; सुभाष देशमुखांचा पाठपुरावा आला ‘कामी’
Next Article रेल्वेवर चढून सेल्फी घेणे तरूणाच्या जीवावर बेतले, उपचारादरम्यान मृत्यू

Latest News

Как заинтересованность трансформируется в страсть
Top News December 8, 2025
four. And that Most other Web based casinos Are similar to Horseshoe Casino?
Top News December 8, 2025
Take pleasure in prize-winning casino games by this finest vendor and you may feel harbors off the highest quality
Top News December 8, 2025
A casino’s interface normally rather impression the to tackle experience
Top News December 8, 2025
To have bets which have near to a great consequences you victory about half the amount of time and you may cure additional half the full time
Top News December 8, 2025
Manage I need to Down load The new Hollywood Local casino Pennsylvania App?
Top News December 8, 2025
Of many online gambling fans be aware that an educated web based casinos provide multiple incentives
Top News December 8, 2025
$fifty No-deposit Gambling establishment Added bonus to start your own Playing Feel!
Top News December 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?